कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीवरील चंद्रे ते कसबा वाळवे दरम्यानचा कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा सुरक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन दूधगंगा पाटबंधारे,उपविभाग निढोरीच्या सहाय्यक अभियंता भाग्यश्री पाटील यांनी केले.
पावसाळा सुरु झाला की धरणाचे पिलर पडल्याचे अथवा स्लॅबला भेगा पडल्याच्या भितीची चर्चा जोराने सुरू होते. या अनामिक अफवेच्या भितीने चंद्रे, अर्जूनवाडा, तिटवे ,कसबा वाळवे गावातील विद्यार्थी भयभीत होतात.
दूधगंगा पाटबंधारे,उपविभाग निढोरीच्या सहाय्यक अभियंता भाग्यश्री पाटील यांनी पाहणी करून बंधाऱ्यास कोणताही धोका नसल्याचे सांगीतले. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले.