कोल्हापूर : सायबर महाविद्यायातर्फे शनिवार २४ सप्टेंबर २०२२ रोजी समाज माध्यमे आणि मानसिक आरोग्य या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप प्रसंगी बोलताना डी. वाय. पाटील विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. राकेश मुदगल यांनी वरील विचार मांडले समाज माध्यमे ही दुहेरी शस्त्रा सारखी असतात. वास्तविक पाहता सध्याच्या काळात विशेष करुन कोरोना संक्रमणा पासून खूप मोठ्या प्रमाणत समाज माध्यमांचा वापर सुरू असून यातून समाजिक मानसिकतेला मोठ्या प्रमाणात हाणी पोहचत आहे. खर तर याचा वापर समाज विकासासाठी केला जावा आशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी परिक्षा नियंत्रक श्री. बी. एम. हिर्डेकर यांनी गरजेनुसार समाज माध्यमांचा वापर केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, बऱ्याच वेळेस हा वापर असंवेदनशील गोष्टींसाठी केला जातो व त्यामुळे सामाजिक मानसिकता बिघडते. कौटुंबिक व सामाजिक संवाद अशा अतिरेकी वापरामुळे हरवत चालले आहे याची खंत व्यक्त करून या उलट सुसंवादासाठी याचा वापर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. सायबर चे संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी सध्याची तरुणपिढी ही सरासरी रोज तीन तासांपेक्षा जास्त असा मौल्यवान वेळ समाज माध्यमात खर्ची घालत असून ही गोष्टी सामाजिक विकासाला घातक असल्याचे सांगून हे चित्र बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले.
परिसंवादात सकाळच्या उद्घाटन सत्रात परिसंवादाचे समन्वयक समाज कार्य विभाग प्रमुख डॉ. दिपक भोसाले यांनी अशा परिसंवादातून विचार मंथन होऊन काही दिशा मिळू शकते असे प्रतिपादन केले व यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक समस्यांवर परिसंवाद आयोजित करणे ही गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सत्रात बिजभाषण गोवा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्री. प्रकाश कामत यांनी समाज माध्यमे अभासी असून त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध जोडणे मानसिक आरोग्यासाठी घातक असून, अशा समाज माध्यमांचा अतिरेक वापरावर नैतिक बंधने घातली जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सायबर क्राईम या विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोमल पाटील यांनी समाज माध्यमांच्या गैर वापरामुळे होणाऱ्या गुन्हांच्या प्रमाणत वाढ होत असून याला प्रतिबंध बसण्यासाठी समाज प्रबोधन होण्यासाठी सायबर क्राईम हा विभाग कार्यरत असल्याचे सांगून त्यांनी व त्यांचे सहकारी श्री. अजय सावंत यांनी कशा प्रकारे गुन्हे होतात व ते कसे टाळले जाऊ शकतात या विषयी सादरीकरण केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश आपटे यांनी केले. तर डॉ. एस. पी. राजपूत व डॉ. के. एन. रानभरे यांनी पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. तर टी. व्ही. जी. सर्मा व प्रशासकीय अधिकारी श्री. विनायक साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. वरील परिसंवादाची सुरुवात प्रा. सचिन जगताप यांच्या बासरी वादनाने व समाजकर्य विभागाच्या वैभव सुरवंशी व शिवानंद पोळ यांच्या समूहाने सादर केलेल्या पथनट्याने झाली. परिसंवादाचे आभार प्रदर्शन प्रा. उर्मिला चव्हाण यांनी केले. या परिसंवादात कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश व महाराष्ट्र अशा विविध जिल्ह्यातून सुमारे पन्नास हून अधिक संशोधक प्राध्यापक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनधींनी सहभाग दर्शविला. परिसंवाद यशस्वी होण्यासाठी सायबर चे व्यवस्थापकीय सचिव डॉ. रणजीत शिंदे चार्टर्ड अकाऊंटंट, श्री. ऋषिकेश शिंदे, प्रा. सागर ठाकूर, प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर यांनी परिश्रम घेतले.