+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका
schedule16 May 21 person by visibility 9685 categoryगुन्हे

कोल्हापूर

    मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील रहदारीचा सार्वजनिक डांबरीकरण रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. फांद्या तोडायची परवानगी असताना वृक्ष पुर्ण तोडले बद्दल कारवाई करावी अशी मागणी स्वरा वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते.

   तलेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत.

वृक्ष तोड झालेल्या ग्रामस्थां, आझाद हिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्ते आर. डी. शिंदे, बाबासाहेब कांबळे यांनी कामगार तलाठी याना दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले. या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी. दोषींवर कार्यवाही अशी मागणी अध्यक्षप्रमोद जनार्दन माजगावकर यांनी निवेदनातून केली आहे.