+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन... adjustमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन adjustआ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी adjustभात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ adjustतर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ? adjustकारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय? adjustदक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड adjustगोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श : महेंद्र पंडीत adjustभाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर adjustदिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पात‌ळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule16 May 21 person by visibility 9464 categoryगुन्हे

कोल्हापूर

    मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील रहदारीचा सार्वजनिक डांबरीकरण रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. फांद्या तोडायची परवानगी असताना वृक्ष पुर्ण तोडले बद्दल कारवाई करावी अशी मागणी स्वरा वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते.

   तलेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत.

वृक्ष तोड झालेल्या ग्रामस्थां, आझाद हिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्ते आर. डी. शिंदे, बाबासाहेब कांबळे यांनी कामगार तलाठी याना दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले. या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी. दोषींवर कार्यवाही अशी मागणी अध्यक्षप्रमोद जनार्दन माजगावकर यांनी निवेदनातून केली आहे.