+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustतांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस प्रक्रिया क्षमता ३० वरून ८०टक्के पर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट* - *वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील* adjustदेशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये* *डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ* adjustचाइल्डलाइन संस्थेने केली `त्या` संबधितांची कानउघाडणी adjustराजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार बसवंत पाटील यांना जाहीर* adjustभारत राष्ट्र समिती पक्ष* adjustनग्न पूजेची आणिबाणी; महिलांनी सोडले नोकरीवर पाणी adjustशिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न* adjust50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती adjustआपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके* adjustबालकांसाठी काम करणाऱ्या संस्था घेणार मनपा प्रशासकांची भेट
schedule16 May 21 person by visibility 9230 categoryगुन्हे

कोल्हापूर

    मौजे ऐनी (ता.राधानगरी) येथील रहदारीचा सार्वजनिक डांबरीकरण रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. फांद्या तोडायची परवानगी असताना वृक्ष पुर्ण तोडले बद्दल कारवाई करावी अशी मागणी स्वरा वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 33 कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमातून वृक्षारोपण केले होते.

   तलेवाडी कॅनॉल पूल ते मौजे ऐणी येथे वनक्षेत्र वनअधिकारी राधानगरी विभाग यांच्यामार्फत 88 वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली होती.संबधित ठेकेदाराने फांद्या तोडण्याऐवजी 80 ते 90 झाडे संपूर्ण मुळापासून तोडली आहेत.

वृक्ष तोड झालेल्या ग्रामस्थां, आझाद हिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्ते आर. डी. शिंदे, बाबासाहेब कांबळे यांनी कामगार तलाठी याना दोषींवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते. तरी आद्यप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले. या गोष्टीचा पूर्ण छडा लागून मुख्य सुत्रधारापासून शेवटच्या कामगारां पर्यंत चौकशी व्हावी. दोषींवर कार्यवाही अशी मागणी अध्यक्षप्रमोद जनार्दन माजगावकर यांनी निवेदनातून केली आहे.