Awaj India
Register
Breaking : bolt
डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!

जाहिरात

 

दोन मंत्र्यांच सरकार राज्य कसं चालवणार : सतेज पाटील

schedule06 Aug 22 person by visibility 4452 categoryराजकीय

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर 06 ऑगस्ट 2022

लोकशाहीमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळ असणे महत्वाचे आहे.नवीन सरकारमधील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विकासाला मारक आहे,अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडील काही अधिकार हे त्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत.नुकताच हा निर्णय झाला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचेच सरकार सुमारे 35 दिवसांपासून काम करत आहे.यावर बोलताना ते म्हणाले की,शिंदे - फडणवीस सरकारला 40 मंत्री अजून ठरवता येत नाहीत आणि हे सरकार कसे चालवू शकतील ?मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचा फटका विकासकामांना बसत आहे.केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे योग्य आहे का?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान - 

काँग्रेस पक्षातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यासह विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.यावेळी पक्षातर्फे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे,असे सतेज पाटील म्हणाले .


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes