+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन... adjustमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन adjustआ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी adjustभात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ adjustतर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ? adjustकारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय? adjustदक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड adjustगोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श : महेंद्र पंडीत adjustभाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर adjustदिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पात‌ळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule06 Aug 22 person by visibility 3936 categoryराजकीय
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर 06 ऑगस्ट 2022

लोकशाहीमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळ असणे महत्वाचे आहे.नवीन सरकारमधील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विकासाला मारक आहे,अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडील काही अधिकार हे त्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत.नुकताच हा निर्णय झाला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचेच सरकार सुमारे 35 दिवसांपासून काम करत आहे.यावर बोलताना ते म्हणाले की,शिंदे - फडणवीस सरकारला 40 मंत्री अजून ठरवता येत नाहीत आणि हे सरकार कसे चालवू शकतील ?मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचा फटका विकासकामांना बसत आहे.केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे योग्य आहे का?

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान - 

काँग्रेस पक्षातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यासह विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.यावेळी पक्षातर्फे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे,असे सतेज पाटील म्हणाले .