+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule24 Sep 22 person by visibility 275 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी 

कोल्हापूर : समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे की , 'पहिले ते हरिकथा निरूपण , दुसरे ते राजकारण , तिसरे ते सावधगिरी सर्वाविषयी.' शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा करून घेण्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही . आग्र्याहून शिताफीने करून घेतलेली सुटका तर शिवचरित्रातील विलक्षण अध्याय होता. औरंगजेबासारख्या धूर्त आणि कुटील बादशहालादेखील बेसावध ठेवून महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन कैदेतून निसटून गेले . एखाद्या कादंबरीतच शोभावा अशी ही घटना प्रत्यक्षात घडवून आणणे हे एका अतिशय बुद्धिमान आणि सावध व्यक्तीलाच शक्य होते . शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा , ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली . हाच दैदिप्यमान इतिहास शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर येतोय. जगदंब क्रिएशन प्रस्तुत आणि डॉ . अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे . येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही . भय हा शब्द महाराजांच्या शब्दकोशात नव्हता .मुघल बादशहा औरंगजेब याने दगाबाजी करत शिवाजी महाराजांना कैद केले होते. आग्र्यातील किल्यात शिवाजी महाराजांना कैदेत ठेवण्यात आले होते .तरीही शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले होते . शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाने मुघलांचे तख्त हादरले होते . 

 शिवचरित्रातील हाच महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटात डॉ.अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत यतीन कार्येकर ,प्रतीक्षा लोणकर , हरक अमोल भारतीय , शैलेश दातार , हरीश दुधाडे, मनवा नाईक , पल्लवी वैद्य , अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल , आदी ईराणी , विश्वजित फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत . चित्रपटातील चार गाण्यांचा साज स्फुरण वाढवणारा आहे . गीतकार हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार , रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे .पार्श्वसंगीत शशांक पवार यांचे आहे.
 
डॉ . अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत , सोनाली घनश्याम राव , चंद्रशेखर ढवळीकर , कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत . प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत . रविन्द्र मानकाने कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे . संवाद डॉ अमोल रामसिंग कोल्हे , युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ . अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे . क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायझरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे . कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर आहेत.साहस दृश्ये रवी दिवाण तर वेशभूषा मानसी अत्तरदे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे . रंगभूषा राहुल सुरते तर केशभूषा जयश्री नाईक यांची आहे . निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे.