Awaj India
Register
Breaking : bolt
आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणीयुनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून* *डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट*हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणार

जाहिरात

 

ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने* *पूरग्रस्तांना कोरड्या खाद्यपदार्थांचे वाटप*

schedule30 Jul 24 person by visibility 547 category

*
-संकट गंभीर तितकीच आमची युवा पिढी खंबीर - आमदार ऋतुराज पाटील
-16 निवारा केंद्रांमधील हजार 81 पूरबाधिताना मदतीचा हात

संकट गंभीर तितकीच आमची युवा पिढी खंबीर आहे. पूर परिस्थितीच्या वेळी ऋतुराज पाटील फाउंडेशनचे सर्व सहकारी मदतीसाठी नेहमीच तत्पर आहेत, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने आमदार पाटील यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

    जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरीकांसाठी महानगरपालिकेकडून शहरात 16 निवारा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. निवारा केंद्रामधील 1 हजार 81 पूर बाधित नागरिकांना ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने कोरडे खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील यांनी जाधववाडी, शाहू विद्यालय येथील निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यानी यावेळी दिला. पावसाचा जोर कमी होऊन पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे दैनंदिन जीवन लवकरच सुरळीत होईल, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. 

  तत्पूर्वी, अजिंक्यतारा कार्यालय येथे झालेल्या संवाद बैठकीत आमदार ऋतुराज पाटील 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या काळात देखील फाउंडेशनच्या वतीने मदत कार्य राबवण्यात आले होते. यावर्षीहीच्या उपक्रमात सहभागी होऊन फौंडेशनच्या युवा सहकाऱ्यांनी दिलेले पाठबळ नेहमीच समाजासाठी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes