Awaj India
Register
Breaking : bolt
एस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती

जाहिरात

 

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात

schedule22 Dec 22 person by visibility 687 categoryशैक्षणिक


आवाज इंडिया
(युवराज राजीगरे-चुयेकर)

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन घेण्यात आले.
   संत गाडगेबाबा महाराज पुण्यदिना निमित्त ऑनलाईन काव्य संमेलन व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला .
             साहित्यकार व थोर विचारवंत प्रा. सुरेश कुऱ्हाडे यांनी अध्यक्षपद स्विकारले . कोल्हापूर जिल्हा नूतन अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
या संमेलनास लाभलेल्या पाहुण्या सुजाता पेंडसे थोर साहित्यकार यांची व अध्यक्षांची ओळख पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ .सुवर्णा पवार मॅम यांनी करून दिली यानंतर कविसंमेलनास सुरवात झाली . संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये कवयित्री उर्मिला तेली मॅम, मेघा शहा मॅम, माणिक नागावे मॅम, वृषाली होगाडे मॅम व सन्मा .कवि सुभाष चोपडे सर , दशरथ ( आण्णा ) कांबळे सर, सुरेश वडर सर, प्रविण मोरे सर , संकेत पाटील सर यांनी सहभाग नोंदविला .
    जेष्ठ कवयित्री डॉ . रेखा पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्य घेणेत आलेली उजळली भाग्यरेखा हा स्पर्धा निकाल जाहिर करणेत आला . त्यांनी विजेत्यांना रू .२९७५ चे बक्षिस जाहिर केले . स्पर्धा परिक्षक सौ . वर्षा फटाकळे यांनी उत्कृष्ट निरपेक्ष केले होते .
         संमेलनाचे अध्यक्ष प्रा . कुराडे सरांनी साहित्या बद्दल , व पाहुणे सन्मा . सुजाता पेंडसे यांनी कविता कशी असावी या बद्दल मार्गदर्शन केले .
           जिल्हा समिती खजिनदार शिवानी कानकेकर मॅम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सुत्रसंचालन केले .  
         जिल्हा समिती कार्याध्यक्ष युवराज राजीगरे सर यांनी सर्व उपस्थिता सह कार्यकारिणी विशाल शिरसट सर, विजय जायभाये सर, सचिव सुंमत पाटील सर, .शिल्पा मुसळे मॅम, . चैताली कापसे मॅम , छाया देसले मॅम व सर्व कवि कवयित्री यांचे मनःपुर्वक आभार मानून सव्वा तास चाललेल्या या सुंदर काव्य संमेलनाची सांगता झाली .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes