
आवाज इंडिया
(युवराज राजीगरे-चुयेकर)
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन घेण्यात आले.
संत गाडगेबाबा महाराज पुण्यदिना निमित्त ऑनलाईन काव्य संमेलन व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला .
साहित्यकार व थोर विचारवंत प्रा. सुरेश कुऱ्हाडे यांनी अध्यक्षपद स्विकारले . कोल्हापूर जिल्हा नूतन अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
या संमेलनास लाभलेल्या पाहुण्या सुजाता पेंडसे थोर साहित्यकार यांची व अध्यक्षांची ओळख पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ .सुवर्णा पवार मॅम यांनी करून दिली यानंतर कविसंमेलनास सुरवात झाली . संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये कवयित्री उर्मिला तेली मॅम, मेघा शहा मॅम, माणिक नागावे मॅम, वृषाली होगाडे मॅम व सन्मा .कवि सुभाष चोपडे सर , दशरथ ( आण्णा ) कांबळे सर, सुरेश वडर सर, प्रविण मोरे सर , संकेत पाटील सर यांनी सहभाग नोंदविला .
जेष्ठ कवयित्री डॉ . रेखा पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्य घेणेत आलेली उजळली भाग्यरेखा हा स्पर्धा निकाल जाहिर करणेत आला . त्यांनी विजेत्यांना रू .२९७५ चे बक्षिस जाहिर केले . स्पर्धा परिक्षक सौ . वर्षा फटाकळे यांनी उत्कृष्ट निरपेक्ष केले होते .
संमेलनाचे अध्यक्ष प्रा . कुराडे सरांनी साहित्या बद्दल , व पाहुणे सन्मा . सुजाता पेंडसे यांनी कविता कशी असावी या बद्दल मार्गदर्शन केले .
जिल्हा समिती खजिनदार शिवानी कानकेकर मॅम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सुत्रसंचालन केले .
जिल्हा समिती कार्याध्यक्ष युवराज राजीगरे सर यांनी सर्व उपस्थिता सह कार्यकारिणी विशाल शिरसट सर, विजय जायभाये सर, सचिव सुंमत पाटील सर, .शिल्पा मुसळे मॅम, . चैताली कापसे मॅम , छाया देसले मॅम व सर्व कवि कवयित्री यांचे मनःपुर्वक आभार मानून सव्वा तास चाललेल्या या सुंदर काव्य संमेलनाची सांगता झाली .