Awaj India
Register
Breaking : bolt
ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड​निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली

जाहिरात

 

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात

schedule22 Dec 22 person by visibility 726 categoryशैक्षणिक


आवाज इंडिया
(युवराज राजीगरे-चुयेकर)

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन घेण्यात आले.
   संत गाडगेबाबा महाराज पुण्यदिना निमित्त ऑनलाईन काव्य संमेलन व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला .
             साहित्यकार व थोर विचारवंत प्रा. सुरेश कुऱ्हाडे यांनी अध्यक्षपद स्विकारले . कोल्हापूर जिल्हा नूतन अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
या संमेलनास लाभलेल्या पाहुण्या सुजाता पेंडसे थोर साहित्यकार यांची व अध्यक्षांची ओळख पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ .सुवर्णा पवार मॅम यांनी करून दिली यानंतर कविसंमेलनास सुरवात झाली . संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये कवयित्री उर्मिला तेली मॅम, मेघा शहा मॅम, माणिक नागावे मॅम, वृषाली होगाडे मॅम व सन्मा .कवि सुभाष चोपडे सर , दशरथ ( आण्णा ) कांबळे सर, सुरेश वडर सर, प्रविण मोरे सर , संकेत पाटील सर यांनी सहभाग नोंदविला .
    जेष्ठ कवयित्री डॉ . रेखा पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्य घेणेत आलेली उजळली भाग्यरेखा हा स्पर्धा निकाल जाहिर करणेत आला . त्यांनी विजेत्यांना रू .२९७५ चे बक्षिस जाहिर केले . स्पर्धा परिक्षक सौ . वर्षा फटाकळे यांनी उत्कृष्ट निरपेक्ष केले होते .
         संमेलनाचे अध्यक्ष प्रा . कुराडे सरांनी साहित्या बद्दल , व पाहुणे सन्मा . सुजाता पेंडसे यांनी कविता कशी असावी या बद्दल मार्गदर्शन केले .
           जिल्हा समिती खजिनदार शिवानी कानकेकर मॅम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सुत्रसंचालन केले .  
         जिल्हा समिती कार्याध्यक्ष युवराज राजीगरे सर यांनी सर्व उपस्थिता सह कार्यकारिणी विशाल शिरसट सर, विजय जायभाये सर, सचिव सुंमत पाटील सर, .शिल्पा मुसळे मॅम, . चैताली कापसे मॅम , छाया देसले मॅम व सर्व कवि कवयित्री यांचे मनःपुर्वक आभार मानून सव्वा तास चाललेल्या या सुंदर काव्य संमेलनाची सांगता झाली .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes