+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule18 Jul 20 person by visibility 3285 categoryलाइफस्टाइल
लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद
: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर-(प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रवासी पास दोन आठवडे बंद ठेवावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना शनिवारी पाठविली आहेत.
राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, कामगार, आदींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून परवाने दिले जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार(दि.२१)पासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रवासी पास देण्यात येऊ नयेत. केवळ तातडीची वैद्यकीय सुविधा, मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना सूट राहील. अशी विनंती या पत्राद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.