Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरकर्तव्यनिष्ठेचा सन्मान: दिपाली पाटील यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ*महिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ*

जाहिरात

 

राजकारणात बदल हवा असेल, तर विचारांची माणसं निवडा

schedule21 Jan 26 person by visibility 512 categoryराजकीय

 


राजकारणात बदल हवा असेल, तर विचारांची माणसं निवडा
आज राजकारण म्हटलं की अनेकांच्या मनात चीड, राग आणि निराशा दाटून येते. कारण सध्या चाललेलं राजकारण हे स्वार्थ आणि सत्ताकेंद्रित झालेलं दिसतं. मात्र जेव्हा राजकारण समाजाच्या हितासाठी, विकासाच्या दिशेने आणि मूल्यांच्या आधारावर चालतं—तेव्हा त्याच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

 करवीर तालुक्यातील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात असेच एक अभ्यासू, विचारवंत आणि कृतीशील नेतृत्व पुढे येत आहे—महाबोधी पद्माकर निगवे खालसा,( ता. करवीर) येथील हुशार आणि जाणीवपूर्वक समाजासाठी काम करणारे तरुण.
महाबोध्दी पद्माकर यांनी विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरत तरुणांमध्ये प्रबोधनाचं कार्य केलं आहे. समाजसुधारणा हा केवळ बोलण्याचा विषय न ठेवता त्यांनी तो प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी दिलेली व्याख्याने, संघटनात्मक कामातून केलेले नेतृत्व आणि चळवळींमधील त्यांचा सक्रीय सहभाग हे त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
वंचित, दुर्लक्षित घटकांच्या समस्या त्यांना पुस्तकी नाहीत—तर त्या त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. त्यामुळेच सामान्य माणसाचं दुःख, त्याच्या गरजा आणि विकासाच्या अपेक्षा ते सखोलपणे समजून घेतात. सामाजिक चळवळीतील त्यांचा अखंड सहभाग त्यांना संवेदनशील आणि जबाबदार नेतृत्व बनवतो.
आज जर राजकारणात खऱ्या अर्थाने सुधारणा करायची असेल, तर विकासाची भूमिका घेणाऱ्या, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तींना संधी देणं आवश्यक आहे. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी महाबोधी पद्माकर यांचा पुढाकार हा सर्वसामान्य मतदारांसाठी भाग्याचीच बाब आहे.
चला तर मग, नवा विचार स्वीकारूया
विकासाला संधी देऊया
आणि हुशार, प्रामाणिक व समाजाभिमुख नेतृत्व निवडून आणूया.
निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील सजग नागरिकांनो—जागृत व्हा!
विकासासाठी मतदान करा.
महाबोधी पद्माकर यांना संधी द्या.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes