+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule18 Nov 23 person by visibility 178 categoryराजकीय
* माजी आमदार अमल महाडिक यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी*

कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. 

       पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे या रस्त्यांची देखभाल करणे महानगरपालिकेला शक्य होत नाही. परिणामी कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. 

      पर्यटक आणि भाविकांची कोल्हापुरात होणारी वाढती गर्दी लक्षात घेता कोल्हापुरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत घ्यावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये शिये फाटा ते कसबा बावडा ते ताराराणी पुतळा रस्ता, तावडे हॉटेल ते ताराराणी पुतळा रस्ता, फुलेवाडी चौक ते महानगरपालिका, वाशी नाका ते महापालिका, शिवाजी पूल ते महापालिका,उजळाईवाडी ते ताराराणी पुतळा,सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ आणि उचगाव ते टेंबलाई नाका चौक या रस्त्यांचा समावेश आहे. 

          सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर या रस्त्यांची अवस्था सुधारेल आणि कोल्हापूर महानगरपालिकेवरील बोजा कमी होऊन भाविक, पर्यटक आणि कोल्हापूरच्या नागरिकांची सोय होईल असा विश्वासही महाडिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मा.नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम उपस्थित होते.