+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन adjustपिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule10 Oct 23 person by visibility 1500 categoryराजकीय

संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पेटवडगाव येथे मेळावा

पेठवडगाव : 
विद्यमान खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे तर माजी खासदार चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आत्मक्लेष यात्रा काढत आहेत.हे दोन्ही आजी-माजी खासदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत यामुळेच देशाच्या सर्वोच्च सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्रतेने मांडण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी केला.
पेठ वडगाव (ता.हातकणंगले) येथील शेतकरी संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. गुजरात येथील 
गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीतभाई पटेल, भीमराव पाटेल, भीमराव साठे, नितीन पाटील,
बाळासाहेब पाटील,राजेंद्र सुतार, अनिल पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

माने पुढे म्हणाले, ऊसाला पाच हजार शंभर रुपये मिळावे यासाठी गेले चार महिने आम्ही संघर्ष करत आलो, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये याबाबत लोकप्रबोधन करण्याचं काम आम्ही केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील 871 तर सांगली जिल्ह्यातील 561 गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव घेऊन देशाचे सहकार मंत्री व पंतप्रधान यांना पाठवणार आहे.
यावेळी गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीत भाई पटेल म्हणाले, आमच्या राज्यामध्ये जवळच्या एका साखर कारखाने विस्तारीकरण केले म्हणून आम्ही लगेच विस्तारित करण केले असे होत नाही एखादा छोटा कारखाना असेल तो कारखाना मोठ्या कारखान्यामध्येविलीनीकरण करून क्षमता वाढवावी हा आमचा हेतू असतो. मार्च अखेर गत हंगामात 3675 आम्ही ऊसाला दर दिला. यासाठी साखर उतारा साडेअकरा टक्के होता. साखर कारखान्याचे नियोजनही अत्यंत नेटकेपणाने झाले की उसाला दर सुद्धा चांगला दर देता येतो.
दरम्यान विनय पब्लिकेशन प्रकाशित शिवाजी माने लिखित 'तिढा शेती प्रश्नाचा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी यावेळी शामल सुतार, श्रावणी पाटील,या विद्यार्थ्यांची भाषण झाले.
स्वागत सदाशिव कुलकर्णी यांनी केले.प्रस्ताविक शितल कांबळे यांनी केले.आभार शामसुंदर जायगुडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र खैरे यांनी केले.