Awaj India
Register
Breaking : bolt
कामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;

जाहिरात

 

विकासाच्या जोरावरच श्री महालक्ष्मी सहकारी सत्तारूढ पॅनलचे विमान भरारी घेणार

schedule09 Jan 23 person by visibility 7115 categoryराजकीय


जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी निवडणूक

कोल्हापूर आवाज इंडिया

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी 2009 साली पंधरा टक्के कर्जाचा व्याजदर होता. तो आज साडेनऊ टक्के करण्यात आला आहे. सभासदांचा आमच्यावर विश्वास असून महालक्ष्मी सत्ताधारी सहकार आघाडीच्या विमान चिन्हावर शिक्का मारून आम्ही विजयी होणार असा विश्वास संस्थेचे माजी अध्यक्ष एम. आर. पाटील  यांनी व्यक्त केला.

ते आजरा, चंदगड, गडहिंग्लज या ठिकाणी प्रचार प्रसंगी बोलत होते. यावेळी सुकाणू समितीचे माजी अध्यक्ष व्ही. पी. साबळे, सहाय्यक लेखा अधिकारी माजी अध्यक्ष महावीर सोळांकुरे, विद्यमान अध्यक्ष राजू परीट, विद्यमान संचालक रणजीत उर्फ बंडा पाटील, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, माजी उपाध्यक्ष शांताराम माने, सुकाणू समितीचे माजी
अध्यक्ष एम. एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेची सुसज्ज इमारत, सभासदांच्यासाठी सांस्कृतिक कार्यालय, या सत्ताधारी पॅनलच्या जमेच्या बाजू आहेत.

सभासदांना 35 लाखांच्या पर्यंत कर्ज मर्यादा 40 मिनिटात उपलब्ध करून दिले जाते, तात्काळ कर्ज पन्नास हजार पर्यंत दिले जात, संस्थेच्या पारदर्शकतेसाठी संस्थेने आपल्या नावाचे ॲप लॉन्च केले आहे.त्यामध्ये सभासदांचे शेअर्स वर्गणी ठेवी, इतर वर्गणी ठेव यांची माहिती घरबसल्या सभासदांना मिळते, कर्जदार व जामीनदार यांची रक्कम घरबसल्या सभासदांना मिळते, संस्थेच्या सेविंग खात्यावरून 50 हजार पर्यंत सभासदांना दिवसा व्यवहार करता येतो, या संस्थेच्या जमेच्या बाजू असल्याकारणाने सत्ताधारी यांचा विजय होणार असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

संस्थेच्या विरोधात चालू असलेली कर्मचारी भरतीची केस संस्थेने जिंकली असल्यामुळे व संस्थेचा होणारा खर्च वाचला आहे ही विरोधकांना चपराक आहे कारण विरोधकांमधील काही अपप्रवृत्तीच्या लोकांनीच कर्मचाऱ्यांनाही ही केस लढवायला प्रवृत्त केले होते असल्याची  टीकाही यावेळी करण्यात आली.

विरोधकांना मिळाले नाही उमेदवार
विरोधकांना उमेदवार न मिळाल्यामुळे शिक्षक गटातून दोन उमेदवार विजयी झाले असल्याने उर्वरित सर्व उमेदवार दोन तृतीय अंश बहुमताने विजयी होणार असा आत्मविश्वास मान्यवरांनी व्यक्त केला .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes