Awaj India
Register
Breaking : bolt
शाळेतील शाळेतील मुलांवर मोबाईलचा परिणाम महिलांच्या आरोग्याने सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;

जाहिरात

 

मानसिक आरोग्य व दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात सौ. स्नेहा पेंढे-जकाते यांचे योगदान कौतुकास्पद; '

schedule04 Mar 26 person by visibility 425 categoryउद्योग

कोल्हापूर (प्रतिनिधी):
गेल्या दशकभरापासून मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र झटणाऱ्या मल्लेवाडी येथील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सौ. स्नेहा ऋषिकेश पेंढे-जकाते यांना त्यांच्या सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळख
सौ. स्नेहा पेंढे-जकाते यांनी २०१२ पासून मानसशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. MA (Clinical Psychology) सोबतच त्यांनी 'रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी'मध्ये विशेष पदविका प्राप्त केली आहे. त्या केवळ रुग्णोपचार करत नाहीत, तर बालरोगतज्ज्ञ, हृदयविकार, मेंदूविकार आणि किडनी विकार तज्ज्ञांकडे 'ऑन-कॉल' सल्लागार म्हणून कार्यरत असून, शारीरिक व्याधींसोबतच रुग्णांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतात.
'स्नेहबंध'च्या माध्यमातून नवी उमेद
२०१९ मध्ये त्यांनी मल्लेवाडी येथे 'स्नेहबंध समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्र' सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढले आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी त्या 'कॉलेज कौन्सिलर' म्हणूनही काम पाहतात, जिथे विद्यार्थ्यांच्या ताणतणावांचे निराकरण केले जाते.
दिव्यांग मुलांसाठी विशेष कार्य
महाराष्ट्र राज्यातील विविध दिव्यांग व मतिमंद मुलांच्या शाळांमध्ये जाऊन सौ. स्नेहा या मुलांसाठी 'व्यवसाय प्रशिक्षण' (Vocational Training) आयोजित करतात. बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. केवळ मुलेच नव्हे, तर अशा मुलांच्या पालकांचेही त्या समुपदेशन करून त्यांना मानसिक बळ देतात.
प्रसारमाध्यमांतून जनजागृती
केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'सकाळ', 'पुढारी' यांसारख्या वृत्तपत्रांतून लेख लिहून आणि रेडिओ-टीव्हीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा संदेश घराघरांत पोहोचवला आहे.
"मानसिक आरोग्य जपल्यास अर्धे आजार आपोआप बरे होतात. विशेषतः दिव्यांग मुलांमध्ये असलेली सुप्त कला ओळखून त्यांना स्वावलंबी करणे, हेच जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes