कोल्हापूर
जयसिंगपूर येथील सि.स. नंबर 1251 येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली काढण्यात आली. निळे झेंडे घेत बाबासाहेबांचा जयजयकार करत रॅली दसरा चौक, व्हिनस कॉर्नर,बसंत -बहार रोड या मार्गाहून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आली.
हजारोच्या संख्येने उपस्थितीत आंबेडकरीप्रेमी नागरिकांनी रॅलीला सुरुवात दसरा चौकातून केली. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
बाबासाहेबांचा जयजयकार करत, पूतळा त्याच ठिकाणी झाला पाहिजे अशा घोषणानी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा समिती जयसिंगपूर यांचे निवेदन स्वीकारले. नागरिकांनी संविधानाचा मान राखत शांतता निर्माण करावी, असे आव्हान त्यांनी केले.
सि.स.स नंबर 1266 येथे घेतलेला ठराव रद्द करण्यात यावा,या जागेतील सार्वजनिक मुतारी काढण्यात येऊ नये, तिचे संरक्षण करण्यात यावे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुतळ्यासाठी सिस नंबर 1266 मध्ये 250 चौरस मीटर जागा पत्राद्वारे देण्यात आली आहे या पत्राची खाते निहाय चौकशी करण्यात यावी,त्या जागेचे रेडीरेकेनरच्या दराने चलन भरले असल्यास त्याची चलन पावती देण्यात यावी,आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी निमंत्रक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, संघटक पुतळा समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे,
संघटक कैलास काळे, उपाध्यक्ष आदमभाई मुजावर, कार्याध्यक्ष श्रीपती सावंत, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती सासणे, उपाध्यक्ष साजिदा घोरी,
सचिव मनीषा पवार, युवा आघाडीचे विश्वजीत कांबळे, उपाध्यक्ष अमित वाघवेकर, सचिव सचिन कांबळे, प्रवीण शिंदे, बाजीराव नाईक, प्रदीप पेरणे, सतीश भंडारे, सुरेश कांबळे, आकाश कुरणे, अरविंद धरणगुत्तीकर आदी मान्यवर उपस्थित होते.