+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विन्रम अभिवादन... adjustमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने अभिवादन adjustआ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी adjustभात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ adjustतर के.पी. ना राधानगरी विधानसभेत परिवर्तन शक्य ? adjustकारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय? adjustदक्षिण विधानसभा मतदारसंघातील 24000 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड adjustगोकुळ’ सहकार क्षेत्रातील आदर्श : महेंद्र पंडीत adjustभाजपा जिल्हा कार्यालयात विविध आघाडी मोर्चा कार्यकारणी जाहीर adjustदिव्यांगांची पेंशन वाढ करण्यासाठी शासन पात‌ळीवर प्रयत्न करणार : आ. पाटील
schedule08 Nov 23 person by visibility 152 category
आवाज इंडिया 

गौरव शिंदे

गेल्या काही दिवसापासून शांततेच्या मार्गाने सुरु असलेले ऊस दराच्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत चालले आहे. या ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अटळ आहे.
     गत हंगामातील उसाला दुसरा हफ्ता 400 रुपये आणि यावर्षी पहिली उचल 3500 रुपये द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 22 दिवस 522 कि मी आक्रोश पदयात्रा काढत शांततेच्या मार्गाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन मागील हफ्त्याची मागणी केली आहे परंतु या बाबत अद्याप एकही कारखान्याने सकारात्मकता दाखवलेली नाही.
   उत्पादन खर्च वाढलेला असताना चालू हंगामासाठी 3500 रुपये पहिली उचल व मागील 400 रुपये मिळावेत अशी शेतकऱ्यांची भावना आहे.संघटनेचे कार्यकर्ते सद्या ठिकठिकाणी ऊस तोडी बंद पाडत आहेत. जर कारखानदार ऐकत नसतील आणि शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नसतील तर दिवाळी नंतर आंदोलन तीव्र करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
      काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे.काही ठिकाणी बंदोबस्तात ऊस वाहतूक सुरु आहे. या पूर्वीचा इतिहास बघितला तर शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना उसाचा दर वाढून मिळाला आहे अशी भावना शेतकऱ्यांची आहे त्यामुळे अनेक गावात ऊस दराचे आंदोलन मिटत नाही तोपर्यंत ऊस तोड घ्यायची नाही असा ठराव करण्यात आला आहे.