Awaj India
Register
Breaking : bolt
माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळी

जाहिरात

 

बहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडे

schedule22 Jan 26 person by visibility 676 categoryसामाजिक

कोल्हापूर | प्रतिनिधी
बहुजन समाजाच्या हक्कांसाठी पत्रकारितेला चळवळीचे स्वरूप देत गेल्या चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रा. अंकुश गोविंद वाकडे (रा. यवतमाळ) यांनी मूकनायक पुरस्कारासाठी आपल्या नावाचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या ते दैनिक **‘पब्लिक पोस्ट’**चे संपादक म्हणून कार्यरत असून यापूर्वी दैनिक पुण्यनगरी, पुढारी, नवभारत, भास्कर, टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई चौफेर आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये जिल्हा प्रतिनिधी व संपादकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू केवळ बातम्या न राहता बहुजन समाजाचे प्रश्न, हक्क व प्रबोधन हा राहिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या विचारांचा प्रचार–प्रसार व्हावा यासाठी प्रा. वाकडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक विहारात प्रत्यक्ष भेटी देत जनजागृती केली. पत्रकारितेतील सामाजिक भान, बाबासाहेबांचे जीवन–विचार व संघर्ष यांवर त्यांनी सातत्याने प्रबोधनात्मक कार्य केले आहे.
पत्रकारितेबरोबरच त्यांचे सामाजिक योगदानही उल्लेखनीय आहे. पारधी व कोलाम समाजातील दुर्लक्षित मुलींच्या शिक्षणासाठी १८ मुली दत्तक घेऊन शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यापैकी ११ मुली आज नोकरीत कार्यरत असून उर्वरित मुलींच्या शिक्षणासाठी मदत सुरू आहे. तसेच आई मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून कोलाम समाजातील २८३ कुमारी माता असलेल्या मुलींना शैक्षणिक, सामाजिक व मानसिक आधार देण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. समता पर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
“माझा जीवनप्रवास, कार्य व योगदान हाच माझा खरा बायोडाटा आहे,” असे नमूद करत, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी व पत्रकारितेच्या मूल्यांसाठी समर्पित कार्याची दखल मूकनायक पुरस्कारासाठी घेतली जावी, अशी अपेक्षा प्रा. अंकुश गोविंद वाकडे यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes