Awaj India
Register
Breaking : bolt
चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये*

जाहिरात

 

गतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

schedule25 Oct 24 person by visibility 436 category


कोल्हापूर ; 
गतवेळच्या विधानसभा मतदारसंघात 42 हजारपेक्षा अधिक मताने विजयी झालो, आता यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी पुढाकार घेतला. विरोधकांनी विकास कामाच्या ठिकाणी जाऊन तपासावी म्हणजे त्यांना समजेल किती विकासकामे झाले आहेत.

आयटी पार्कमध्ये बेरोजगारांना मिळणार संधी

आमदार पाटील म्हणाले, कोरोना यासह विरोधकांचे सरकार असल्यामुळे बरेच काम करता आलं नाही. आयटी पार्क साठी काम सुरू असून येणाऱ्या भविष्यकाळात ते काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पाच वर्षात ग्रामीण भागातील रस्ते यासह क्रीडांगण विविध विकास कामे करता आली. यापुढेही उर्वरित कामे करणार असून भागाचा कायापालट करणार आहे. मतदार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून यावेळी सुद्धा ते मला भरघोस मतांनी विजयी करतील असे पाटील यावेळी म्हणाले.

जिल्हाभर नियोजन असल्यामुळे मतदारसंघात मतदान कमी

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिण लोकसभा मतदारसंघात मला तेवढा वेळ देता आला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात
मताधिक्य कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes