Awaj India
Register
Breaking : bolt
इस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,

जाहिरात

 

गतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

schedule25 Oct 24 person by visibility 456 category


कोल्हापूर ; 
गतवेळच्या विधानसभा मतदारसंघात 42 हजारपेक्षा अधिक मताने विजयी झालो, आता यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी पुढाकार घेतला. विरोधकांनी विकास कामाच्या ठिकाणी जाऊन तपासावी म्हणजे त्यांना समजेल किती विकासकामे झाले आहेत.

आयटी पार्कमध्ये बेरोजगारांना मिळणार संधी

आमदार पाटील म्हणाले, कोरोना यासह विरोधकांचे सरकार असल्यामुळे बरेच काम करता आलं नाही. आयटी पार्क साठी काम सुरू असून येणाऱ्या भविष्यकाळात ते काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पाच वर्षात ग्रामीण भागातील रस्ते यासह क्रीडांगण विविध विकास कामे करता आली. यापुढेही उर्वरित कामे करणार असून भागाचा कायापालट करणार आहे. मतदार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून यावेळी सुद्धा ते मला भरघोस मतांनी विजयी करतील असे पाटील यावेळी म्हणाले.

जिल्हाभर नियोजन असल्यामुळे मतदारसंघात मतदान कमी

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिण लोकसभा मतदारसंघात मला तेवढा वेळ देता आला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात
मताधिक्य कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes