Awaj India
Register
Breaking : bolt
सांगलीत ५ एप्रिलला लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरपरप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणीदिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेश

जाहिरात

 

गतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

schedule25 Oct 24 person by visibility 339 categoryराजकीय



कोल्हापूर ; 
गतवेळच्या विधानसभा मतदारसंघात 42 हजारपेक्षा अधिक मताने विजयी झालो, आता यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी पुढाकार घेतला. विरोधकांनी विकास कामाच्या ठिकाणी जाऊन तपासावी म्हणजे त्यांना समजेल किती विकासकामे झाले आहेत.

आयटी पार्कमध्ये बेरोजगारांना मिळणार संधी

आमदार पाटील म्हणाले, कोरोना यासह विरोधकांचे सरकार असल्यामुळे बरेच काम करता आलं नाही. आयटी पार्क साठी काम सुरू असून येणाऱ्या भविष्यकाळात ते काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पाच वर्षात ग्रामीण भागातील रस्ते यासह क्रीडांगण विविध विकास कामे करता आली. यापुढेही उर्वरित कामे करणार असून भागाचा कायापालट करणार आहे. मतदार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून यावेळी सुद्धा ते मला भरघोस मतांनी विजयी करतील असे पाटील यावेळी म्हणाले.

जिल्हाभर नियोजन असल्यामुळे मतदारसंघात मतदान कमी

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिण लोकसभा मतदारसंघात मला तेवढा वेळ देता आला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात
मताधिक्य कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes