Awaj India
Register
Breaking : bolt
हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणारNEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणारग्रामीण विकासासाठी अध्यक्षा शिल्पा खोत यांचा धडाकेबाज तालुका दौरा; गडहिंग्लजमध्ये नागरिकांच्या समस्यांवर प्रशासन तत्परकोल्हापूरच्या पाच तालुक्यांत आता फुलणार ‘पांढरे सोने’; ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी १० मे पासून अर्ज प्रक्रिया सुरूविनाअनुदानित शाळांना कोल्हापूर खंडपीठाचा मोठा दिलासा; जाचक शासन निर्णय रद्द!कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटनडॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शोप्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर*

जाहिरात

 

गतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

schedule25 Oct 24 person by visibility 337 categoryराजकीय



कोल्हापूर ; 
गतवेळच्या विधानसभा मतदारसंघात 42 हजारपेक्षा अधिक मताने विजयी झालो, आता यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामासाठी पुढाकार घेतला. विरोधकांनी विकास कामाच्या ठिकाणी जाऊन तपासावी म्हणजे त्यांना समजेल किती विकासकामे झाले आहेत.

आयटी पार्कमध्ये बेरोजगारांना मिळणार संधी

आमदार पाटील म्हणाले, कोरोना यासह विरोधकांचे सरकार असल्यामुळे बरेच काम करता आलं नाही. आयटी पार्क साठी काम सुरू असून येणाऱ्या भविष्यकाळात ते काम पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.
पाच वर्षात ग्रामीण भागातील रस्ते यासह क्रीडांगण विविध विकास कामे करता आली. यापुढेही उर्वरित कामे करणार असून भागाचा कायापालट करणार आहे. मतदार यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला असून यावेळी सुद्धा ते मला भरघोस मतांनी विजयी करतील असे पाटील यावेळी म्हणाले.

जिल्हाभर नियोजन असल्यामुळे मतदारसंघात मतदान कमी

लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाभर लक्ष असल्याकारणाने दक्षिण लोकसभा मतदारसंघात मला तेवढा वेळ देता आला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात
मताधिक्य कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes