Awaj India
Register
Breaking : bolt
हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*

जाहिरात

 

रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी

schedule29 Jul 24 person by visibility 801 category

*रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी*

            कोल्हापूरला महापुराने विळखा घातला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत पाणी साठून राहिल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ते रुई या प्रमुख जिल्हा मार्गावर रुई येथे बंधाऱ्यासाठी दोन्ही बाजूना मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. 

            रुई बंधाऱ्याच्या भरावामुळे साचून राहिलेले हे पाणी गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, रुकडी, शिये, वडणगे, प्रयाग चिखलीसह कोल्हापूर शहर आणि पुलाची शिरोली इथल्या शेतीत आणि नागरी वस्त्यांमध्ये घुसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या सर्व नुकसानीची भरपाई देताना शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडतो.

            रुई येथील बंधाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यासाठी टाकलेला भराव न हटवल्यास भविष्यात उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. 
या सर्व बाबींचा विचार करून रुई येथील बंधाऱ्यासाठी टाकण्यात आलेला भराव त्वरित हटवावा या मागणीचे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. 

          या बंधाऱ्या जवळील भराव हटवल्यास पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल आणि मोठी हानी टळेल. त्यामुळे युद्धपातळीवर यंत्रणा राबवून भराव हटवण्याचे काम सुरु करावे अशी मागणी महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यापुढे पुरक्षेत्रात विकासकामे करताना योग्य काळजी घ्यावी अशा सूचना महाडिक यांनी केल्या. यावर त्वरित उपाययोजना करू, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्याने दिले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes