+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule05 Dec 23 person by visibility 258 category
आवाज इंडिया

कोल्हापूर - प्रशांत चुयेकर

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अखेर के. पी. पाटील यांचीच सत्ता आली. विजयाला उत्तर देताना चेअरमन पाटील यांनी आता परिवर्तन 2024 ला असं उत्तर देत थेट आ.प्रकाश आबीटकर यांना विधानसभेसाठी चॅलेंज केले.

 बिद्री सहकारी साखर कारखाना आताच्या पॅनलमध्ये
विधानसभेतील विरोधक सोबत होते. ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते सोबत कायम राहिल्यास के.पी. पाटील यांना विधानसभा निवडणूकीत परिवर्तन घडवण्यास मदत होऊ शकते. 

विधानसभेतील उमेदवार गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा राहुल देसाई, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित जाधव यांनी निवडणूक लढवली होती.
के. पी. पाटील यांचा पराभव 18,430 मतांनी झाला होता. बिद्री कारखाना निवडणुकीत सध्या सोबत असणारे अरुण डोंगळे यांना 15,336 मते सत्यजित जाधव यांना 5,952 मते, राहूल देसाई 12,901 मते पडली होती. यासह इतर उमेदवारांना सोबत घेतल्यास विधानसभेचा टप्पा पार करण्यासाठी के.पी यांना कोणी अडवू शकत नाही.
बिद्री साखर कारखाना निवडणुकीत ए. वाय. पाटील यांचा कोणताही करिष्मा दिसला नाही त्यामुळे त्यांच्यापासून विधानसभेला काय धोका असू शकतो याची भीती आता केपी यांना राहिली नाही असेही बोलले जातं.