Awaj India
Register
Breaking : bolt
फॅशन सूत्रा'च्या माध्यमातून कोल्हापूरच्या दिव्या घाटगे यांचा यशस्वी झेप; ९ स्टॉलपासून सुरू झालेला प्रवास आता ६० पार!डी. वाय.पाटील विद्यापीठाचा ‘डेंग्यू डिटेक्टर’ आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम* जिल्ह्यात 16 मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम;इचलकरंजीची 'सुवर्णकन्या' सौ. सुवर्णा पवार यांचा साहित्यिक क्षेत्रातील झंझावातजिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण: कोल्हापूरच्या नीलम बनछोडेइचलकरंजीच्या दीपमाला तारळकर यांचे उल्लेखनीय कार्यसमाजसेवेचा वसा जपणारी व्यक्तीमत्व: बबिता जाधव यांच्या कार्याचा विविध स्तरावर गौरवसमाजसेवेचा वसा: सात राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित सुनिता उदाळे यांचे कार्य प्रेरणादायीप्रगल्भ कवयित्री आणि संवेदनशील समाजसेविका : श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावेनिवृत्तीनंतरही स्नेहल जाधव यांची सामाजिक बांधिलकी

जाहिरात

 

जिल्ह्यात 16 मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम;

schedule06 Mar 26 person by visibility 84 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर,  : जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. 
 
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 मार्चपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
 विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर हा केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविताना चालकासह मागील आसनावरील प्रवाशाने देखील हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे.
 
तसेच राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किणी टोल नाका येथे “No Helmet No Entry” अभियान राबविण्यात येत असून विना हेल्मेट दुचाकीस्वारांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालवू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि “हेल्मेट वापरा- जीवन वाचवा” हा संदेश सर्वत्र पोहोचवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes