हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तर
schedule10 Apr 26 person by visibility 20 category
कोल्हापूर : हनुमान सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. तसेच निव्वळ नफा १ कोटी ५२ लाख रुपये झाल्याची माहिती संस्थापक चेअरमन बळवंत पाटील (मास्तर) यांनी दिली.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना पाटील यांनी सांगितले की, या वर्षात संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली असून सर्वच घटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ३६ लाख १० हजार रुपये इतके असून, ठेवींचा आकडा १०७ कोटी ७ लाख ४२ हजार ५०४ रुपये इतका झाला आहे.
याशिवाय, संस्थेने ८५ कोटी ३५ लाखांचे कर्ज वितरण केले असून, ३८ कोटी ८७ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ४७५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
मुख्य व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
ही यशस्वी घोडदौड संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
यावेळी चेअरमन तानाजी पाटील, संचालक प्रशांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.
संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशीच प्रगती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना पाटील यांनी सांगितले की, या वर्षात संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली असून सर्वच घटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संस्थेचे भागभांडवल १ कोटी ३६ लाख १० हजार रुपये इतके असून, ठेवींचा आकडा १०७ कोटी ७ लाख ४२ हजार ५०४ रुपये इतका झाला आहे.
याशिवाय, संस्थेने ८५ कोटी ३५ लाखांचे कर्ज वितरण केले असून, ३८ कोटी ८७ लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ४७५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
मुख्य व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
ही यशस्वी घोडदौड संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाली असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
यावेळी चेअरमन तानाजी पाटील, संचालक प्रशांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते.
संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशीच प्रगती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.