Awaj India
Register
Breaking : bolt
आरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीर

जाहिरात

 

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव*

schedule08 Apr 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या ‘बायोस्किल-२०२६’ परिषद संपन्न 
 
आजच्या काळात जैवतंत्रज्ञानाचे महत्व अतिशय वाढले असून औषधनिर्मिती, कृषी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावीपणे वापरले जात आहे. भविष्यातील करिअरसाठी या क्षेत्रात कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम संशोधक डॉ. एस. आर. यादव यांनी केले. 
 
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘बायोस्किल-२०२६’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. राकेशकुमार शर्मा, डॉ. एस. आर. यादव, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद जी. दस्तगर यांच्या हस्ते झाले. यावेळी संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, प्रा. डॉ. के. डी. सोनवणे, प्रा. डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, डॉ. रेश्मा पवार, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. शिवाजी काष्टे, डॉ. पद्मजा देसाई, डॉ. रजनी बनसोडे, डॉ. मेघा देसाई, डॉ. अश्विनी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी यादव पुढे म्हणाले की, स्टेम सेल आणि पुनरुत्पादक औषधशास्त्रामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडत असून भविष्यात अनेक असाध्य रोगांवर प्रभावी उपचार शक्य होणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील कौशल्ये, डेटा विश्लेषण, बायोइन्फॉर्मेटिक्स आणि आंतरशाखीय ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. 
 
डॉ. सय्यद जी. दस्तगर म्हणाले, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढविण्याची गरज असून, बॅक्टेरियल नॅनोसेल्युलोज हे भविष्यातील अत्यंत उपयुक्त जैवसाहित्य ठरणार आहे. बॅक्टेरियल नॅनोसेल्युलोजची नॅनो-फायब्रिलर रचना आणि उच्च जलधारण क्षमता यामुळे ते पेशींचे स्थिरीकरण आणि वाढ (यासाठी अनुकूल ठरते. त्यामुळे वैद्यकीय, औषधनिर्मिती, ऊतक अभियांत्रिकी, तसेच अन्न व पॅकेजिंग उद्योगात त्याचा व्यापक वापर होऊ शकतो.
 
कुलगुरू डॉ. शर्मा यांनी जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल व पुनरुत्पादक औषधशास्त्र या क्षेत्रातील करिअर संधींवर मार्गदर्शन केले. त्यांनी या क्षेत्रातील संशोधन, आरोग्यविषयक उपयोग आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा आढावा घेतला. परिषदेत एकूण १० महाविद्यालयांमधून १३० प्रतिनिधि उपस्थित होते 
 
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes