Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

राष्ट्रीय कथास्पर्धेचे पुरस्कार जाहीर

schedule16 Jan 24 person by visibility 568 categoryलाइफस्टाइल


कोल्हापूर : ( युवराज राजीगरे)

:- अक्षरक्रांती फाऊंडेशन, नागपूर व महारुद्र प्रकाशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने *बदलते युग: काल आणि आज* या विषयावर नुकतीच ग्रामीण कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.   
          यात महाराष्ट्र, गोवा,मध्यप्रदेश, कर्नाटकसह देशभरातून १२१ कथाकारांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. त्यात *संजीवनी बंदावणे / पांडे, पुणे* यांच्या 'आमराईचे गाव' ही कथा प्रथम पुरस्कारप्राप्त ठरली असून द्वितीय पुरस्काराचा मान *अलकनंदा घुगे / आंधळे, संभाजीनगर* यांच्या 'गोष्ट एका वाडीची' या कथेने पटकावला. तसेच तृतीय पुरस्काराची मानकरी चिंचपाडा, पेण येथील *निता पाटील* यांची 'नांदी' ही कथा ठरली. प्रोत्साहनपर कथेचा मान नाशिक येथील *नंदकिशोर ठोंबरे* यांच्या 'सावी' या कथेला तसेच मुंबई येथील *सुनील कुलकर्णी* यांच्या 'वेगळा विचार' या कथेला मिळाला आहे. 
         पुरस्काराचे स्वरूप प्रथम ५००० ₹ रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय ३००० ₹ रोख व सन्मानचिन्ह, तृतीय २००० ₹ रोख व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक १००० ₹ रोख व सन्माचिन्ह असे आहे . १० फेब्रुवारीला गोवा येथील शासकीय महाविद्यालय, साखळीच्या सभागृहात *केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक* यांच्या हस्ते पारितषिक वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सदर आयोजन हे शासकीय महाविद्यालय साखळीच्या मराठी विभागातर्फे करण्याचे ठरले आहे. सदर कथास्पर्धेचे परीक्षण नागपूर येथील ज्येष्ठ कवी, लेखक व समीक्षक *मा. प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* यांनी केले असून ते विद्यार्थांना कथासंदर्भात मार्गदर्शन करतील. 
         कथास्पर्धेचे आयोजन अक्षरक्रांती फाऊंडेशन नागपूरचे संस्थापक अध्यक्ष *मा. शंकर घोरसे* तथा महारुद्र प्रकाशन गोवाचे *मा. अजय बुआ* यांनी केले होते. स्पर्धेत सहभागी कथाकारांच्या निवडक २५ कथांचा एक *प्रातिनिधिक संग्रह* सुद्धा लवकरच काढण्यात येणार असून सहभागी कथाकारांना पुस्तकाच्या ५ प्रती निःशुल्क भेट देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा मनोदय दोन्ही संस्थेच्या वतीने आयोजकांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षीच्या आयोजनाचा व पुरस्कार वितरणाचा सोहळा हा महारष्ट्रात घेण्याचे निश्चित झाले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला अधिकाधिक साहित्यिक मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes