Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांना* *स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग*हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -

जाहिरात

 

उपचार, योजनांचा नावाखाली सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील

schedule12 Jul 20 person by visibility 1438 categoryराजकीय

आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर:
राज्य सरकारने मृतदेहाच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार, तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, रुग्णांना जेवण पुरवण्यात भ्रष्टाचार, मास्कमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यासह राज्याच्या ग्रामविकास खात्याने चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा ही गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 'करोना संसर्गाच्या काळात उपचार आणि उपाय योजनांच्या नावाखाली राज्य सरकारने मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. हा पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होतील. या सर्व प्रश्नांचा जाब महाविकास आघाडीला विचारण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात विचारला जाणार आहे. या अधिवेशनाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींना १०० टक्के १४ व्या वित्त आयोगातून निधी दिला. त्यातून ग्रामपंचायतींची स्वायत्तता वाढवली. गावाच्या विकासाची कामे केल्यानंतर उर्वरित रक्कम ग्रामपंचायतींनी मुदत ठेवीमध्ये ठेवली. याच रकमेच्या व्याजावर ग्रामविकास खात्याकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाला असून या प्रकरणी लवकरच केंद्र सरकारला पत्र लिहून राज्य सरकारचा कारभार कळवणार आहे.' राज्य सरकारने करोना संसर्गाच्या काळात जनतेच्या पैशांचा गैरवापर करुन पीपीई किट, मास्क, रुग्णांना दिले जाणारे जेवण यापासून ते औषधांपर्यंत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला. तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes