Awaj India
Register
Breaking : bolt
बँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणीश्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धारचाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*

जाहिरात

 

माजी सैनिकांना प्रशासक नेमा: लक्ष्मीकांत हांडे

schedule24 Jul 20 person by visibility 2325 categoryउद्योग

माजी सैनिकांना  प्रशासक नेमा: लक्ष्मीकांत हांडे                कोल्हापूर: 
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.                              हांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या विकासात सैनिकांचे योगदान अढळ राहिले आहे. ज्या ज्या वेळी देश संकटात सापडला त्या त्या प्रत्येक वेळी देशातील सैनिकांनी जीवाची बाजी लावत परकीय शत्रूंपासून देशाचे रक्षण केले आहे. केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर देशातील आपत्कालीन परिस्थितीतही  सैनिकच नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात असतात.
देशासाठी आजपर्यंत हजारो वीरांनी बलिदान दिले आहे. युद्धभूमीवर शत्रूशी लढताना प्राण गेला तरी बेहत्तर पण माझा देश वाचला पाहिजे, यासाठीच आपलं आयुष्य वेचणारे सैनिकच या राष्ट्राचे खरे तारणहार  आहेत. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई व्हावे असे सरकारला मनोमन वाटत असेल तर त्यांनी  प्रत्येक जिल्ह्यात सैनिकांसाठी राखीव जागा ठेवत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची निवड करावी अशी मागणी हांडे यांनी केली आहे.                           
    कारगिल विजयी दिनी घोषणा करा
  देशाच्या इतिहासात 26 जुले हा  कारगिल विजयी दिवस अभिमानास्पद असून सरकारने या दिवशीच माजी सैनिकांची  ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करत कारगिल युद्धात शाहिद झालेल्या शूरवीरांना अनोखी मानवंदना द्यावी, अशी मागणीही हंडे यांनी व्यक्त केली आहे.     
              कोरोना काळातही खांद्याला खांदा
   कोरोना काळात ज्यांनी काम करणे आवश्यक होते अशा अनेक संबंधित घटकांनी आपली जबाबदारी झटकत यातून पळ काढला; मात्र राज्यातील माजी सैनिकांनी जबाबदारीची जाणीव ओळखून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. कोरोना संसर्गाची भीती असतानाही हे रणभूमीवरचे योद्धे कोरोनाविरुद्ध लढताना मागे हटले नाहीत.त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून राज्य सरकारने त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी लक्ष्मीकांत हंडे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes