+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule18 Jul 20 person by visibility 3450 categoryलाइफस्टाइल
लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद
: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर-(प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रवासी पास दोन आठवडे बंद ठेवावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना शनिवारी पाठविली आहेत.
राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, कामगार, आदींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून परवाने दिले जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार(दि.२१)पासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रवासी पास देण्यात येऊ नयेत. केवळ तातडीची वैद्यकीय सुविधा, मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना सूट राहील. अशी विनंती या पत्राद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.