Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा

schedule30 Aug 21 person by visibility 537 categoryसंपादकीय

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, प्रशासनानेही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने या कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी, वसुलीची अट रद्द करण्यात यावी, यासह गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. अनेक वेळा मोर्चे आंदोलन आणि निवेदन देऊनही प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येत ६ सप्टेंबरला जिल्हा परिषदेसमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार शंभर ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी या आंदोलनात एक दिवस काम बंद ठेवून सहभागी होणार आहेत. याबाबत उद्या सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देखील देण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes