Awaj India
Register
Breaking : bolt
करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेट

जाहिरात

 

करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला

schedule23 Jul 26 person by visibility 37 categoryगुन्हे

माझ्या हद्दीतील ६५० कोटींचा माल लांबवला!
करवीर तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप; 
कोल्हापूर:
पंचगंगा महिला खाण मंजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादा, टोपच्या चेअरमन सौ. पूजा हनुमंत चौगुले यांनी प्रशासनातील अधिकारी आणि काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर उत्खनन करून तब्बल ६५० कोटी रुपयांचा माल लांबवल्याचा दावा त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. मागण्या मान्य कराव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्या उपोषणाला बसल्या आहेत 
भागीदारांची नावे:
चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या बेकायदेशीर उत्खननात खालील व्यक्ती भागीदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे:
१) शिवाजी आनंदा पोवार (रा. गंगातीर्थनगर - अध्यक्ष, मी वडार महाराष्ट्राचा संघटना)
२) आनंद पाटील - माजी खणीकर्म अधिकारी (कोल्हापूर)
३) जी. गुरुप्रसाद - माजी उपवन संरक्षक (कोल्हापूर)
४) सुनील गायकवाड - सहा. पोलीस निरीक्षक, MIDC शिरोली
प्रकरणाची पार्श्वभूमी व आरोप:
पत्रकात नमूद केल्यानुसार, सौ. पूजा चौगुले यांच्या हद्दीमध्ये ४५,००० ब्रास बेकायदा उत्खनन झाल्याचा ठपका ठेवून २२ कोटींची नोटीस बजावण्यात आली होती. सन २०२३ मध्ये त्यांचे काम बंद करून करवीर तहसीलचे स्वप्निल  रावडे यांनी शिवाजी पोवार यांच्याशी संगनमत केले. त्यानंतर स्वतःची यंत्रणा लावून शिवाजी पोवार यांच्यामार्फत उत्खनन सुरू ठेवण्यात आले.
गेल्या २ वर्षांत जवळपास १५ ते २० लाख ब्रास माल लांबवण्यात आला आहे. तावडेंच्या दराने या मालाची किंमत अंदाजे ६५० कोटी रुपये होते.
उपोषणाचा इशारा:
माझ्या हद्दीतील ६५० कोटींच्या मालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने, मंगळवार दि. २७/०१/२०२६ पासून आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा सौ. पूजा हनुमंत चौगुले (चेअरमन, पंचगंगा महिला खाण मंजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्या. टोप) यांनी दिला आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes