नामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजार
schedule23 Aug 26 person by visibility 22 categoryराजकीय
कोल्हापूर :
महसूल मंत्री यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार घेणार अशी घोषणा करताच* *कोल्हापुरातील हजारो लोक भाबड्या अपेक्षेने दुपारी 1 वाजल्यापासून मोठी गर्दी करून वाट पाहत होते कि जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल, परंतु नामदार 4.45 वाजता आले* *आणि नेहमीप्रमाणे घाई गडबडीत गर्दीत व ढकलाढकलीत निवेदन घेऊन कोल्हापूरकरांची घोर निराशाच केली असल्याची टीका शिवसेनेचे उपनेतेसंजय पवार यांनी केली.
*नामदार बावनकुळे यांच्या लक्षात आले असेल की त्यांचे महसूल खाते किती निष्क्रिय व भ्रष्ट आहे ज्यांच्याकडे पैसा आणि वशिला आहे त्यांचीच कामे तातडीने* *होतात परंतु सर्वसामान्य लोकांना आपल्या खात्याकडून न्याय मिळत नाही हे आजच्या गर्दीतून कदाचित लक्षात आले असेल.. मागील 10 वर्षाचे ऑडिट केल्यास 50% तहसीलदार जेलमध्ये जातील कारण प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर कामे करून शासनाच्या तिजोरीत जाणारा* *महसूल या लोकांनी व भ्रष्टसाखळीने हडप केला आहे. आपणास विनंती आहे पुढील जनता दरबारात गर्दी कमी पहायची असेल तर कोल्हापुरातील महसूल विभागाला प्रामाणिक व सक्षम अधिकारी द्यावेत व वर्षानुवर्षे कोल्हापुरात वशिलाच्या जोरावर ठाण मांडून जे अधिकारी बसले आहेत त्यांची उचल बांगडी करावी अशी मागणी त्यांनी केली.
महसूल मंत्री यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार घेणार अशी घोषणा करताच* *कोल्हापुरातील हजारो लोक भाबड्या अपेक्षेने दुपारी 1 वाजल्यापासून मोठी गर्दी करून वाट पाहत होते कि जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल, परंतु नामदार 4.45 वाजता आले* *आणि नेहमीप्रमाणे घाई गडबडीत गर्दीत व ढकलाढकलीत निवेदन घेऊन कोल्हापूरकरांची घोर निराशाच केली असल्याची टीका शिवसेनेचे उपनेतेसंजय पवार यांनी केली.
*नामदार बावनकुळे यांच्या लक्षात आले असेल की त्यांचे महसूल खाते किती निष्क्रिय व भ्रष्ट आहे ज्यांच्याकडे पैसा आणि वशिला आहे त्यांचीच कामे तातडीने* *होतात परंतु सर्वसामान्य लोकांना आपल्या खात्याकडून न्याय मिळत नाही हे आजच्या गर्दीतून कदाचित लक्षात आले असेल.. मागील 10 वर्षाचे ऑडिट केल्यास 50% तहसीलदार जेलमध्ये जातील कारण प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर कामे करून शासनाच्या तिजोरीत जाणारा* *महसूल या लोकांनी व भ्रष्टसाखळीने हडप केला आहे. आपणास विनंती आहे पुढील जनता दरबारात गर्दी कमी पहायची असेल तर कोल्हापुरातील महसूल विभागाला प्रामाणिक व सक्षम अधिकारी द्यावेत व वर्षानुवर्षे कोल्हापुरात वशिलाच्या जोरावर ठाण मांडून जे अधिकारी बसले आहेत त्यांची उचल बांगडी करावी अशी मागणी त्यांनी केली.