Awaj India
Register
Breaking : bolt
आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांना* *स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग*हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न*

जाहिरात

 

आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमा

schedule23 Apr 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

कोल्हापूर (प्रतिनिधी):
राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण विचारात घेऊन, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समुपदेशक (Counselor) नियुक्त करणे अनिवार्य करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.
 
विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत:
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये शैक्षणिक ओझे, करिअरची अनिश्चितता आणि मानसिक तणावामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात आहेत. मनमोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठ न मिळाल्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही केवळ त्या कुटुंबाची नव्हे, तर समाजाची आणि राष्ट्राची मोठी हानी आहे.
 
प्रमुख मागण्या:
१. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये कायमस्वरूपी 'मानसोपचार तज्ज्ञ' किंवा 'समुपदेशक' (Counselors) यांची नेमणूक करणे अनिवार्य करावे.
२. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात 'मेंटल हेल्थ' सेशनचे आयोजन करण्यात यावे.
३. शैक्षणिक संस्थांमध्ये गोपनीय हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी आपली समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.
४. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
 
विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, संकटांशी लढण्याचे मानसिक बळ देणे ही काळाची गरज आहे. तरी प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने अंमलबजावणी करावी
अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेने केली. 
 
यावेळी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, सचिव धनंजय गायकवाड, सरचिटणीस सूर्यभान इंगळे, शहराध्यक्ष विराज पाटील, आदित्य पाटील, हर्षवर्धन शिंदे, सार्थक पाटील, ओंकार शिंदे, सिद्धार्थ यादव, अथर्व शिंदे, हर्षवर्धन पाटील, अभिजित देसाई, गौरव आवटे, अखिलेश गवळी, सुमित कांबळे, चिन्मय जोशी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes