+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule08 Apr 24 person by visibility 109 categoryगुन्हे

कोल्हापूर दि.८ देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेते, पदाधिकारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप यावेळी होत असतात. परंतु समाजातील काही समाज कंटकांच्यावतीने जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सध्या शहरात सुरु आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रकार घडत आहे. नुकतीच रोहित कुंभार या व्यक्तीने भारत माता, प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केली आहे. भारतीय जनता पार्टी सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.

याविषयात सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन सादर केले.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी संबंधित पोस्ट बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना निदर्शनास आणून दिली अशा लोकांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून अशा लोकांना वेळीच कठोर शासन करण्याची मागणी केली. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान तसेच हिंदू देव देवींच्या विटंबनेच्या घटना येथून पुढे सहन केल्या जाणार नाहीत असे सांगत प्रसंगी भाजपा कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे नमूद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर पोस्टची सत्यता स्वत: पडताळली याबाबत आपल्या सायबर क्राईमच्या अधिका-यांना सूचना करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सरचिटणीस डॉ सदानंद राजवर्धन, अॅड संपतराव पवार, अमर साठे, शैलेश पाटील, प्रदीप उलपे, अनिल कामत, अमेय भालकर, सुनील पाटील, रविकिरण गवळी, हर्षद कुंभोजकर आदी उपस्थित होते.