+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन adjustपिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule11 Jul 24 person by visibility 116 category
*
*-आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वरे वेधले लक्ष*

*कोल्हापूर :* रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या पासिंगसाठी आकारले जाणारे विलंबशुल्क आणि प्रादेशिक विभागाच्या अन्य जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करताना सरकारने वाहनांसाठीचे विलंब शुल्क रद्द केले आहे. या निर्णयानंतर कोल्हापुरात वाहनधारकांनी आनंद उत्सव साजरा केला.
 
 रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांना वेळेत पासिंग न केल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन ५० रुपये विलंबशुल्क आकारण्यात आले होते. सदरचे विलंब शुल्क रद्द करा अशी मागणी करत वाहन धारकांनी राज्यभरामध्ये रस्ता रोको, जेलभरो आंदोलन केले होते. आमदार सतेज पाटील यांनी वाहनधारकांच्या विलंब शुल्काच्या प्रश्नावर विशेष उल्लेख सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.

    विधान परिषदेच्या उपसभापतींकडे सादर केलेल्या विशेष उल्लेख सूचना क्रमांक 12 नुसार, प्रादेशिक परिवहन विभागाकडून राज्यात वाहनधारकांवर जाचक अटी लावण्यात आल्यामुळे वाहनदार व डीलर यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. पासिंगसाठी प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारणे, पेपर ट्रान्सफर साठीची ओटीपी प्रणाली बंद करणे, सर्व वहाने दोन-तीन दिवसात ट्रान्सफर करणे आदी विविध मागण्याबाबत अनेक आंदोलने करूनही परिवहन विभागाने दुर्लक्ष दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारने या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचने द्वारे केली होती. आमदार पाटील यांच्या प्रश्नाची दखल घेऊन सरकारने वाहनधारकांचे विलंब शुल्क अखेर माफ केले.

*कोल्हापुरात आनंदोत्सव*
  वाहनधारकांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून न्याय दिल्याबद्दल वाहनधारक संघटनाने आमदर सतेज पाटील यांचे आभार मानले. वाहन धारक संघटनांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. या आनंद उत्सव सोहळ्यात चंद्रकांत भोसले, अरुण घोरपडे, राजेश जाधव, मोहन बागडे, ईश्वर चेनी, अविनाश दिंडे, रमेश पवार, राहुल पवार, अतुल पवार, यांच्यासह वाहन धारक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.



*वाहन पसिंगचा विलंब शुल्क रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी वाहनधारक सातत्याने आंदोलन करत होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून हा प्रश्न सोडवता आला याचे मला मनस्वी समाधान व आनंद वाटत आहे.*
*-आमदार सतेज पाटील*
*विधान परिषद, काँग्रेस गटनेते*