कोल्हापूर :
गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन चालले.
यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले," शेतकरी विरोधी महामार्ग लागणारे धोरण करते हे भांडवलदार यांचे हस्तक आहेत. हा न्या सहन केला तर हे राज्यकर्ते सरकारच कंत्राट वर चालवायला देतील. हे मंत्री स्वतःची ओळख शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करून देत असली तरी ते भांडवलदारांना दत्तक गेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा पश्चिम घाटातील पर्यावरणाला घातक असून शेतकरी याचा बळी ठरेल.
यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील म्हणाले," कोणीही मागणी न करता शासनाने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लागला आहे. प्रत्येक गावामध्ये जमीन संपादनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करा. गावागावात बोर्ड लावून आमची जमीन देणार नाही असा इशारा द्या.
यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे, अजित दादा पवार, नाथाजी पाटील, धनराज चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी भुदरगड तालुक्यातील 23 गावांमधून विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करण्याचे ठरले. आंदोलनाची तीव्रता येणाऱ्या काळात वाढवण्या