+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule29 Jun 22 person by visibility 5805 categoryसामाजिक
आवाज इंडीया
प्रतिनिधी कोल्हापूर

 
      शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार असे ठाम मत बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले.शाहू आघाडीच्या राधानगरी तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते 
   ते पुढे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तन करण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत .राधानगरी शिक्षक समिती ही पुरोगामी विचारांची पाईक असणारी संघटना आहे. यंदाच्या बँक निवडणुकीत संघटनेच्या सर्व शिलेदारांनी एक जुटीन एक दिलाने राधानगरी तालुका पॕनलच्या प्रचारासाठी पालथा घातला आहे .राधानगरीकरांची ही एकजूट पॕनेलच्या विजयाची वज्रमूठ ठरणार आहे. त्यामुळे समस्त राधानगरी कर हे या विजयाचे शिल्पकार असतील,
यावेळी प्रमोद तौंदकर म्हणाले , शिक्षक बँकेत सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करून समस्त शिक्षक वर्गाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बँकेपासून दूर सारण्यासाठी सभासद एकवटले आहेत. शिक्षक बँकेचे कामकाज आदर्श असायला हवे होते पण स्वार्थाने बरबटलेल्या सत्याधारांनी बँकेची लूट केली आहे. बँकेचा लुक बदलणे ,कोअर बँकिंग, निरुपयोगी एटीएम सुविधा ,बँकिंग यावर करोडो रुपये खर्च करून बँक तोट्यात आली आहे .यामुळेच सभासदांचा आक्रोश मतपेटीतून दिसेल आणि परिवर्तन घडेल .
यावेळी राधानगरी सर्वसाधारण गटाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी आपल्या खास शैलीत सध्या लोकप्रिय होत असलेले काय तो डोंगर काय ते जंगल काय ती बँक ही कविता सादर केली.
    यावेळी बंडोपंत केळकर जोतीराम पाटील रवी पाटील अर्जुन पाटील सुनील पाटील विलास चौगुले यांनी मनोगते व्यक्त केले 
या मेळाव्याला भीमराव रेपे हरिदास वऱ्णे प्रकाश कांणकेकर रवींद्र बोडके विलास चौगुले अशोक वाघेरे जीवन कांबळे मधुकर मुसळे मंगेश धनवडे नारायण आयरे शाहू चौगुले संजय चरापले शिवाजी पाटील अशोक साबळे युवराज पाटील विक्रम वागरे तुकाराम संघवी राजू मिटके आर के पाटील आर जी पाटील आनंदा मोगणे तानाजी पाटील भाऊ टिपुगडे संजय भोपळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मधुकर मुसळे व विक्रम वाघरे यांनी केले