Awaj India
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुक्यात दुधातील भेसळीचा प्रश्न गंभीर; जनता दल (सेक्युलर) तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणा

schedule26 Apr 26 person by visibility 2365 categoryसामाजिक

कोल्हापूर: रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी (रा. लाटवडे) यांची द्वितीय कन्या तसेच सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक माळी यांची पुतणी कै. सौ. प्राची दिग्विजय माळी (वय २४) हिचे दि. २४ रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील हायटेक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. तिच्या अचानक झालेल्या निधनाने लाटवडे व पेठ परिसरावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने प्राचीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून संबंधित संस्थेकडे फॉर्मही भरला होता. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या शिकवणीनुसार तिने नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती.
तिच्या निधनानंतर तिचे वडील कृष्णात माळी, चुलते अशोक माळी, पती दिग्विजय माळी तसेच भाऊ गुरुप्रसाद माळी व शुभम माळी आणि संपूर्ण कुटुंबीयांनी तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिचे नेत्रदान पूर्ण केले.
प्राचीच्या या उदात्त कृतीमुळे एका गरजू व्यक्तीला दृष्टी मिळणार असून तिच्या निर्णयामुळे मरणोत्तर देहदान व अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. जगद्गुरुंच्या प्रेरणेने झालेले हे १५९ वे अवयवदान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी, गुरुबंधू व गुरु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes