Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खत साठा उपलब्धद न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेची चूकचवृक्ष तोडणाऱ्या जंगलाच्या *राजा*चा गुरु कोणप्रवेश पत्रात चूक झालेल्या "त्या" विद्यार्थ्यांनाही देता येणार बारावीची परीक्षा"*रमाईच्या त्यागाच्या भूमिकेमुळे आज आपण आनंदात : डॉ. प्रवीण कोडोलीकरश्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण*जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा उत्साहातडी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची निवडचळवळ टिकण्यासाठी एकत्र येणे गरजेचे ; उत्तम कांबळेअण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

जाहिरात

 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार*

schedule05 Aug 24 person by visibility 255 category

*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार* 

जयंत पाटील

कोल्हापूर ;
सांगलीला जाता जाता जयंत पाटील यांची विमानतळ परिसरामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील १० पैकी पारंपारिक ३ जागा चंदगड, राधानगरी भुदरगड, कागल ह्या राष्ट्रवादीकडे असल्याने १०० टक्के या जागा लढवणार आहे. तसेच या ३ जागबरोबरच लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीमुळे पारंपारिक लोकसभेच्या दोन्ही जागा पक्षास सोडाव्या लागल्या असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी इचलकरंजी व कोल्हापूर उत्तर ह्या दोन जागा तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या पक्षास मिळाव्यात असे प्रयत्न करावेत अशी विनंती प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी बोलताना जागावाटपाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल असे आश्वासित करून या पाचही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले त्याचबरोबर महाविकास आघाडी ही भक्कम असून कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणाने येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येण्यासाठी सर्वांनी ताकतीने कामाला लागा असे सांगितले पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जीवाचे रान करा असे सांगितले तिकीट मागायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे परंतु पक्ष एकाच उमेदवाराला तिकीट देणार त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले तर आभार शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी मांडले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे व रावसाहेब भिलवडे, माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीदेवी माने, शहराध्यक्ष पद्मजा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील, इचलकरंजीचे मदन कारंडे, गडहिंग्लजचे अमरसिंह चव्हाण, शिवाजीराव खोत, शिवप्रसाद तेली, कागलचे शिवानंद माळी, बी.के चव्हाण, संतोष मेंगाने, एकनाथराव देशमुख, सुनील देसाई, गणेश जाधव, श्रीकांत पाटील, पंडित कळके, आप्पा हजारे, प्रकाश पाटील, धनाजीराव करवते, निरंजन कदम, अमोल जाधव रामराज बदाले, वसंतराव देसाई इत्यादी सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes