Awaj India
Register
Breaking : bolt
ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*

जाहिरात

 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार*

schedule05 Aug 24 person by visibility 397 category

*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कोल्हापुरातील पाच जागा लढवणार* 

जयंत पाटील

कोल्हापूर ;
सांगलीला जाता जाता जयंत पाटील यांची विमानतळ परिसरामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्ह्यातील १० पैकी पारंपारिक ३ जागा चंदगड, राधानगरी भुदरगड, कागल ह्या राष्ट्रवादीकडे असल्याने १०० टक्के या जागा लढवणार आहे. तसेच या ३ जागबरोबरच लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीमुळे पारंपारिक लोकसभेच्या दोन्ही जागा पक्षास सोडाव्या लागल्या असल्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी इचलकरंजी व कोल्हापूर उत्तर ह्या दोन जागा तरी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या पक्षास मिळाव्यात असे प्रयत्न करावेत अशी विनंती प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जयंत पाटील यांनी बोलताना जागावाटपाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल असे आश्वासित करून या पाचही मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले त्याचबरोबर महाविकास आघाडी ही भक्कम असून कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणाने येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येण्यासाठी सर्वांनी ताकतीने कामाला लागा असे सांगितले पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जीवाचे रान करा असे सांगितले तिकीट मागायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे परंतु पक्ष एकाच उमेदवाराला तिकीट देणार त्यामुळे उर्वरित उमेदवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक व स्वागत जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले तर आभार शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी मांडले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे व रावसाहेब भिलवडे, माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीदेवी माने, शहराध्यक्ष पद्मजा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील, इचलकरंजीचे मदन कारंडे, गडहिंग्लजचे अमरसिंह चव्हाण, शिवाजीराव खोत, शिवप्रसाद तेली, कागलचे शिवानंद माळी, बी.के चव्हाण, संतोष मेंगाने, एकनाथराव देशमुख, सुनील देसाई, गणेश जाधव, श्रीकांत पाटील, पंडित कळके, आप्पा हजारे, प्रकाश पाटील, धनाजीराव करवते, निरंजन कदम, अमोल जाधव रामराज बदाले, वसंतराव देसाई इत्यादी सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes