Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकरणी मोठा निर्णयसांगलीत ५ एप्रिलला लहान मुलांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरपरप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणीदिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चादहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणार

जाहिरात

 

महानगरपालिकेचा किटकनाशक विभागावर कारवाईची फवारणी कधी

schedule13 Aug 24 person by visibility 536 category


कोल्हापूर ; (प्रशांत चुयेकर)
महानगरपालिकेचा किटकनाशक विभाग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. रोगराईचे प्रमाण वाढले असून याबाबत कोणतीही काळजी या विभागाला नसल्याचे दिसत आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
महानगरपालिके अंतर्गत कीटकनाशक विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रोगराई नष्ट व्हावी म्हणून धूर फवारणी केली जाते. माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी यांचा फोन आल्यावरच या विभागातील कर्मचारी त्या ठिकाणी जात असतात. फोन आला नाही तर कोणत्या ठिकाणी हे धूर फवारणी करतात याचा पत्ता ना विभागाला आहे ना प्रशासनाला.

दररोज वापरले जाणारे डिझेल, पेट्रोल व फवारणीसाठी लागणारे औषध याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही. किती फवारणी करायची याबाबतची माहिती विभाग प्रमुख जयंत पवार यांना नाही. याबाबतची माहिती विचारले असता दररोज एक फेर होत असल्याचं त्यांनी सांगितलं.मात्र कोणाकडे किती लिटर पेट्रोल, डिझेल, औषध वापरले जाते दररोज वापरले जाते का याची माहिती नाही.
या विभागात एक झाडू कामगार विभागाची पाहणी करत आहे. त्याच्याच हातात सर्व कंट्रोल आहे. दररोज लागणारे 16 लिटर डिझेल दोन लिटर पेट्रोल या विभागातील आठ कर्मचाऱ्यांना दिले जाते. हे कर्मचारी तेवढ्या साधनाचा वापर न करता निवळ फोटो काढण्यात धूर काढायचा आणि परत गाडी आणून लावायची असा राजरोस कार्यक्रम सुरू आहे.
याबाबतची रीतसर माहिती घेऊन कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विभाग प्रमुखांच्या निष्क्रियतेच्या रोगावर कारवाईचा फवारा मारला जात नाही तोपर्यंत शहरात रोगराई वाढतच राहणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes