Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

जाहिरात

 

राधानगरी शिक्षक समिती पॅनलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार बाळासाहेब पवार

schedule29 Jun 22 person by visibility 6249 categoryसामाजिक

आवाज इंडीया
प्रतिनिधी कोल्हापूर

 
      शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार असे ठाम मत बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले.शाहू आघाडीच्या राधानगरी तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते 
   ते पुढे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तन करण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत .राधानगरी शिक्षक समिती ही पुरोगामी विचारांची पाईक असणारी संघटना आहे. यंदाच्या बँक निवडणुकीत संघटनेच्या सर्व शिलेदारांनी एक जुटीन एक दिलाने राधानगरी तालुका पॕनलच्या प्रचारासाठी पालथा घातला आहे .राधानगरीकरांची ही एकजूट पॕनेलच्या विजयाची वज्रमूठ ठरणार आहे. त्यामुळे समस्त राधानगरी कर हे या विजयाचे शिल्पकार असतील,
यावेळी प्रमोद तौंदकर म्हणाले , शिक्षक बँकेत सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करून समस्त शिक्षक वर्गाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बँकेपासून दूर सारण्यासाठी सभासद एकवटले आहेत. शिक्षक बँकेचे कामकाज आदर्श असायला हवे होते पण स्वार्थाने बरबटलेल्या सत्याधारांनी बँकेची लूट केली आहे. बँकेचा लुक बदलणे ,कोअर बँकिंग, निरुपयोगी एटीएम सुविधा ,बँकिंग यावर करोडो रुपये खर्च करून बँक तोट्यात आली आहे .यामुळेच सभासदांचा आक्रोश मतपेटीतून दिसेल आणि परिवर्तन घडेल .
यावेळी राधानगरी सर्वसाधारण गटाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी आपल्या खास शैलीत सध्या लोकप्रिय होत असलेले काय तो डोंगर काय ते जंगल काय ती बँक ही कविता सादर केली.
    यावेळी बंडोपंत केळकर जोतीराम पाटील रवी पाटील अर्जुन पाटील सुनील पाटील विलास चौगुले यांनी मनोगते व्यक्त केले 
या मेळाव्याला भीमराव रेपे हरिदास वऱ्णे प्रकाश कांणकेकर रवींद्र बोडके विलास चौगुले अशोक वाघेरे जीवन कांबळे मधुकर मुसळे मंगेश धनवडे नारायण आयरे शाहू चौगुले संजय चरापले शिवाजी पाटील अशोक साबळे युवराज पाटील विक्रम वागरे तुकाराम संघवी राजू मिटके आर के पाटील आर जी पाटील आनंदा मोगणे तानाजी पाटील भाऊ टिपुगडे संजय भोपळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मधुकर मुसळे व विक्रम वाघरे यांनी केले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes