Awaj India
Register
Breaking : bolt
सलग २० वेळा सेट-नेट उत्तीर्ण होण्याचा दुर्मिळ विक्रम; डॉ. राहुल भगवान पालके यांचे भव्य यशरिक्षाचालक असूनही समाजसेवेचा वसा जपणारा ‘आदर्श मावळा’ – सौरभ किरण खोतमावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्यसंघर्षातून सेवेकडे : सौ. सोनाली घोडके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासमोफत शिक्षणातून वंचित विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे शिक्षक – श्री. सुनिल रत्नाकर चौगलेवंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्य

जाहिरात

 

राधानगरी शिक्षक समिती पॅनलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार बाळासाहेब पवार

schedule29 Jun 22 person by visibility 6345 categoryसामाजिक

आवाज इंडीया
प्रतिनिधी कोल्हापूर

 
      शिक्षक बँकेत परिवर्तन होऊन आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे पॅनलच्या या ऐतिहासिक विजयात राधानगरी शिक्षक समितीचा सिंहाचा वाटा राहणार असे ठाम मत बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केले.शाहू आघाडीच्या राधानगरी तालुका प्रचार मेळाव्यात ते बोलत होते 
   ते पुढे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तन करण्यासाठी सर्व संघटना सरसावल्या आहेत .राधानगरी शिक्षक समिती ही पुरोगामी विचारांची पाईक असणारी संघटना आहे. यंदाच्या बँक निवडणुकीत संघटनेच्या सर्व शिलेदारांनी एक जुटीन एक दिलाने राधानगरी तालुका पॕनलच्या प्रचारासाठी पालथा घातला आहे .राधानगरीकरांची ही एकजूट पॕनेलच्या विजयाची वज्रमूठ ठरणार आहे. त्यामुळे समस्त राधानगरी कर हे या विजयाचे शिल्पकार असतील,
यावेळी प्रमोद तौंदकर म्हणाले , शिक्षक बँकेत सभासदांच्या पैशाची उधळपट्टी करून समस्त शिक्षक वर्गाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बँकेपासून दूर सारण्यासाठी सभासद एकवटले आहेत. शिक्षक बँकेचे कामकाज आदर्श असायला हवे होते पण स्वार्थाने बरबटलेल्या सत्याधारांनी बँकेची लूट केली आहे. बँकेचा लुक बदलणे ,कोअर बँकिंग, निरुपयोगी एटीएम सुविधा ,बँकिंग यावर करोडो रुपये खर्च करून बँक तोट्यात आली आहे .यामुळेच सभासदांचा आक्रोश मतपेटीतून दिसेल आणि परिवर्तन घडेल .
यावेळी राधानगरी सर्वसाधारण गटाचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी आपल्या खास शैलीत सध्या लोकप्रिय होत असलेले काय तो डोंगर काय ते जंगल काय ती बँक ही कविता सादर केली.
    यावेळी बंडोपंत केळकर जोतीराम पाटील रवी पाटील अर्जुन पाटील सुनील पाटील विलास चौगुले यांनी मनोगते व्यक्त केले 
या मेळाव्याला भीमराव रेपे हरिदास वऱ्णे प्रकाश कांणकेकर रवींद्र बोडके विलास चौगुले अशोक वाघेरे जीवन कांबळे मधुकर मुसळे मंगेश धनवडे नारायण आयरे शाहू चौगुले संजय चरापले शिवाजी पाटील अशोक साबळे युवराज पाटील विक्रम वागरे तुकाराम संघवी राजू मिटके आर के पाटील आर जी पाटील आनंदा मोगणे तानाजी पाटील भाऊ टिपुगडे संजय भोपळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन मधुकर मुसळे व विक्रम वाघरे यांनी केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes