Awaj India
Register
Breaking : bolt
चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये*

जाहिरात

 

स्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीक

schedule22 Jan 26 person by visibility 661 categoryसामाजिक

कोल्हापूर
इन्कमटॅक्स विभागातून निवृत्त झालेले क्रीडापटू व बॉडीबिल्डर तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संदेश सावळाराम जाधव (रा. वात्सल्या सोसायटी, रूम नं. १०२, पहिला माळा, कोयनवेळे, घोटकॅम्प, पेज २, तळोजा) यांनी सामाजिक बांधिलकी जपत बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेले जगातील पहिले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक आज आठ वर्षांचा टप्पा ओलांडत आहे.
२०१८ साली जाधव यांनी हे स्मारक स्वखर्चाने व स्वतःच्या जमिनीवर उभारले. २०१९ मध्ये या स्मारकाचे भव्य उद्घाटन बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दिलिप राव मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हापासून हे स्मारक सामाजिक प्रबोधनाचे केंद्र ठरत आहे.
महामाता भिमाई यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच बाबासाहेब घडले, अशी भावना व्यक्त करत जाधव हे माध्यमांतून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक जागृती करत आहेत. “भिमाई यांनी बाबासाहेबांना जन्म दिला नसता तर आज भारतीय संविधान, शिक्षण, नोकरी व हक्कांची संकल्पना कशी असती?” असा प्रश्न उपस्थित करत ते महामाता भिमाई यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
स्वतःच्या निवृत्तीनंतरही गरजूंना मदत, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन आणि विचारप्रसाराचे काम सातत्याने सुरू ठेवणारे संदेश जाधव यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी केलेल्या या स्मारकनिर्मितीमुळे महामाता भिमाई व रामजी आंबेडकर यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळत असून, पुढील पिढीसाठी ही एक महत्त्वाची वारसा-स्थळ बनत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes