+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा
schedule04 May 24 person by visibility 38 categoryराजकीय
करवीरचे लीड सर्वाधिक असणार : आम.पी.एन. पाटील 

 
 बीडशेड येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा


कोल्हापूर : 

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे. जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. खतांचे दर तिपटीने वाढले आहेत. न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातो. कृषीप्रधान देशाचा कृषिमंत्री कोण हेच कोणाला माहीत नसेल तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न कसे सुटणार? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. मतदानातून शेतकरी निश्चितपणे हा राग व्यक्त करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ बीडशेड (ता. करवीर) येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आमदार पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सडोली खालसा व सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक विश्वास पाटील हे होते. 

 

संभाजीराजे पुढे म्हणाले, शाहू छत्रपती व आमदार पी.एन.पाटील यांची मैत्री आहे. स्वतः पी एन पाटील व त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत.त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही त्याच ताकदीने सक्रिय आहेत.

आमदार पी.एन.पाटील म्हणाले, शाहू छत्रपती महाराजांना जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळत आहे. गावागावांत जास्तीतजास्त मते कशी मिळविता येईल, बाहेरची मते कशी आणता येतील यासाठीच सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. छत्रपतींच्या विजयात करवीर लीड सर्वांधिक असणार आहे. पंतप्रधान, केंद्रातील मंत्री, मुख्यमंत्री कोल्हापुरात भीतीपोटी तळ ठोकत आहेत, याचा अर्थ विरोधी उमेदवाराचा पराभव निश्चित आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. 

 

गोकुळचे संचालक विश्वास पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींचे वातावरण सगळीकडेचं चांगले आहे, ते शेवटपर्यंत टिकवून ठेवूया.अनेक जण म्हणतात की, विमानतळासाठी आम्ही निधी आणला, हे केले, ते केले म्हणून; पण ही सगळी जागा छत्रपतींनी दिली हे ते विसरले असल्याची टीका केली. 

 

यावेळी भोगावतीचे कारखान्याचे संचालक केरबा पाटील यांचे भाषण झाले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, मार्केट कमिटीचे सभापती भारत पाटील भुयेकर, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, सुभाष सातपुते, मारुतीराव जाधव, सुनील खराडे, विजय भोसले, माजी सभापती पांडुरंग पाटील, चेतन पाटील यांचेसह भोगावती कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.