Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*

जाहिरात

 

शेतकरी सुखात राहायचं असेल तर देशाचा पंतप्रधान चंद्रशेखर राव असायला पाहिजे : वामशीधर राव

schedule09 Aug 23 person by visibility 288 categoryराजकीय


इस्लामपूर (आवाज इंडिया)
तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत.त्यामुळे तेथील शेतकरी सुखात आहेत. देशातील शेतकरी सुखात राहायचा असेल तर पंतप्रधान चंद्रशेखर यांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्राचे प्रभारी वामशीधर राव यांनी केले.
ती इस्लामपूर येथे सन्मान मेळाव्या प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले,शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ५ हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठीपण चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. देशासाठी तेलंगणा राज्याचा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी बी. आर.एस. भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा देणे गरजेचे आहे
यावेळी पुणे जिल्हा समन्वयक बी. जी. देशमुख, किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष माणिकदादा कदम,महाराष्ट्र कार्याध्यक्ष कालीदास आपेट,उपाध्यक्ष ऍड अजित काळे,कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश उर्फ बाळ नाईक,कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रोफेसर तोहीद बक्षु,सांगली जिल्हा महिला संघटक शर्वरी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes