Awaj India
Register
Breaking : bolt
एस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती

जाहिरात

 

शेतकरी सुखात राहायचं असेल तर देशाचा पंतप्रधान चंद्रशेखर राव असायला पाहिजे : वामशीधर राव

schedule09 Aug 23 person by visibility 301 categoryराजकीय


इस्लामपूर (आवाज इंडिया)
तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत.त्यामुळे तेथील शेतकरी सुखात आहेत. देशातील शेतकरी सुखात राहायचा असेल तर पंतप्रधान चंद्रशेखर यांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्राचे प्रभारी वामशीधर राव यांनी केले.
ती इस्लामपूर येथे सन्मान मेळाव्या प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले,शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ५ हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठीपण चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. देशासाठी तेलंगणा राज्याचा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी बी. आर.एस. भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा देणे गरजेचे आहे
यावेळी पुणे जिल्हा समन्वयक बी. जी. देशमुख, किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष माणिकदादा कदम,महाराष्ट्र कार्याध्यक्ष कालीदास आपेट,उपाध्यक्ष ऍड अजित काळे,कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश उर्फ बाळ नाईक,कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रोफेसर तोहीद बक्षु,सांगली जिल्हा महिला संघटक शर्वरी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes