Awaj India
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या

जाहिरात

 

गौराई फौंडेशन संचलित गौतमीज यश क्लासेसचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

schedule06 Apr 23 person by visibility 1188 categoryशैक्षणिक


कोल्हापूर : आवाज इंडिया


मार्च - 2019 , 2020 , 2021 व 2022 मधील विशेष गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व वर्ष 2023 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम 26 मार्च ,2023 रोजी ज्ञानदीप सांस्कृतिक हॉल , कसबा बावडा येथे संपन्न झाला . मा अशोक जाधव सर , माजी शिक्षण सभापती , कोल्हापूर महानगरपालिका हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर मा श्री अजितदादा पवार धामोडकर , माजी परिवहन समिती , को म न पा , मा सौ ए एस नवाळे मॅडम ,मुख्याध्यापिका , भाई माधवराव बागल प्रशाला, मा श्री जे जे पाटील सर , मुख्याध्यापक , जीवन कल्याण हायस्कूल , कसबा बावडा , कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
    प्रा बसवंत पाटील संस्थापक अध्यक्ष , गौराई फौंडेशन कोल्हापूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व गेल्या १९ वर्षातील क्लासच्या दैदिप्यमान यशाचा आढावा घेतला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा अजितदादा पवार-धामोडकर , मा जे जे पाटील सर , मा सौ नवाळे मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व सरत्या वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देताना करियर मार्गदर्शन केले . अध्यक्षस्थाना वरून बोलताना मा अशोक जाधव सर म्हणाले , " प्रा पाटील हे अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले ते उत्तम प्रशासक म्हणून काम ही पाहू शकले असते . IAS सारखी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा त्यांची अंतिम निवड होऊ शकली नाही . त्यांनी 19वर्षांपूर्वी लावलेल्या गौतमीज यश क्लासेस रुपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होताना पाहून विषेश आनंद होतो . आम्हा बावडेकरांचे नशीब थोर म्हणून इतक्या समर्पित भावनेने विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन शिकवणारा प्रामाणिक , समाजातील गोर गरीब विद्यार्थ्याप्रती तळमळ असलेला आणि व्यवसायिक क्षेत्रात असून सुध्दा सामाजिक भान जपणारा अवलिया आमच्या पाल्याना शिक्षक म्हणून लाभला ." या वेळी गौतमी बसवंत पाटील (94% , मार्च -2019) , सेजल शिवाजी नेसरकर(निट्टूर ,ता चंदगड ) (96.60 % , मार्च 2020) , तेजोमय ठोंबरे (96.90 , मार्च - 2021) , श्रुती पाटील (95.00 ,मार्च 2022 ) या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला . यासह ८० विद्यार्थ्यांनी सत्कार स्विकारला . या प्रसंगी मा सौ भारती बसवंत पाटील , उपाध्यक्ष , गौराई फौंडेशन , कोल्हापूर ,मा श्री रामचंद्र उमाना पाटील , सदस्य , गौराई फौंडेशन , कोल्हापूर यांच्या सह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. डॉ विठ्ठल पाटील यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes