
कोल्हापूर: राजाराम कारखाना कार्यक्षेत्रातील चोकाकसह हुपरी, इंगळी तसेच वंदूर, करनूर, लिंगनूर परिसरातील सभासदांची माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट घेतली. यावेळी सर्व सभासदांनी राजाराम कारखान्याच्या पारदर्शी कारभाराबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी अमल महाडिक यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार सुरू असल्याचे नमूद केले. तसेच "ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कारखाना प्रशासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ऊस बियाणे- रोपवाटप तसेच माती परीक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन करत उत्पादन वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. महापूर काळात पूर बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन उचल केली. त्प्रत्येक संकटामध्ये सभासदांसोबत आम्ही उभे राहिलो. त्यामुळेच आज सत्तारूढ सहकार आघाडीबाबत सर्वत्र सकारात्मकता जाणवते आहे. आणि हीच सकारात्मकता शेवटी विजयापर्यंत घेऊन जाईल." असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
" केवळ सूडबुद्धीने अपप्रचार करायचा आणि स्वार्थ साधायचा हीच विरोधकांची निती आहे. राजारामच्या कारभारावर बोलण्यासारखे काहीही नसल्यामुळे विरोधक बेताल वक्तव्य करत सुटले आहेत." असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.
यावेळी मा.संचालक आनंदा तोडकर, वडगाव मार्केट कमिटी सदस्य धुळाप्पा डवरे, शिवसिंह घाडगे , महावीर पाटील, देवाप्पा मुधाळे,संजय मगदूम,अविनाश बनगे, कृष्णा निकम, नंदकुमार पाटील, दिनकर ससे, सुभाष माळी, संभाजी निकम, शांताराम देसाई,अनंत बल्लोळे, किरण पोतदार, संभाजी पाटील, श्रीमंधर चौगुले, रावसाहेब पाटील, जिनेंद्र ऐतवडे, शांतीनाथ देसाई, रामू पाटील,तानाजी बागणे, कोंडीबा लोकरे यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते