+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule05 Jan 24 person by visibility 68 categoryराजकीय
०५/०१/२०२४
*खासदार धनंजय महाडिक यांचा केरळ मधील जनतेशी सुसंवाद*

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार, देशभरात विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. देशातील सर्व नागरिकांना अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी संकल्प भारत यात्रा सुरू झाली असून, त्याला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केरळ मधील वडकरा लोकसभा मतदार संघातील गावांमध्ये जावून, विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार खासदार महाडिक केरळ मधील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले असून, थेट जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहेत. वास्तविक केरळ राज्यात भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार नाही. मात्र तरीही विकसित भारत संकल्प यात्रेला केरळमधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान सन्माननिधी, आयुष्यमान भारत कार्ड यासह विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने, नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. केरळ मध्ये नारळ आणि केळी हे प्रमुख पीक आहे. नारळाचे तेल आणि नारळाच्या पाण्यापासून औषधी पदार्थ बनवण्यासाठी, केरळ मधील नागरिकांकडून, केंद्र सरकारच्या योजनांचा प्रामुख्याने लाभ घेतला जात आहे. तसेच मत्स्यसंपदा म्हणजे मच्छिमार लोकांसाठी मोफत जाळी मिळणं किंवा मत्स्यबीज तयार करण्यासाठी अनुदान, शेततळी बनवण्यासाठी अनुदान अशा अनेक योजनांना केरळ मधील जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर पीएम विश्वकर्मा योजनाही केरळमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यातून कष्टकरी आणि पारंपारिक अठरापगड व्यवसायांना मोठी चालना मिळत आहे. शिवाय पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले, रिक्षावाले, यांना होत असल्याने, केरळ मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनाधार वाढत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक, केरळ मधील जनतेत थेट मिसळत असून, केंद्रातील मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत नेण्यात यशस्वी झाले आहेत.