+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule16 Sep 20 person by visibility 3050 categoryलाइफस्टाइल
 जागतिक ओझोन दिन व ओझोन वायूचे महत्व: पृथ्वी भोवती असणारे वातावरण महत्त्वाचे आहे. वातावरणामध्ये नायट्रोजन (78.08), ऑक्सिजन (20.94), कार्बन डाय-ऑक्साइड (0.03), ओझोन (0.00006), आॅरगॉन (0.93), नियाॅन, (0.0018), हायड्रोजन (0.00005) ,हेलियम (0.0005), व इतर वायू आढळतात. वातारणाच्या स्थितांबर थरातील ओझोन वायु आढळतो व त्याचे प्रमाण कमी आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचे शोषण ओझोन वायूमुळे होते व त्यामुळे आपले रक्षण होते म्हणून मानवासाठी ओझोन वायू वरदान आहे व एक प्रकारचे कवच आहे. ओझोन वायूचे महत्व सर्वसामान्य लोकांना माहित झाले पाहिजे व ओझोन वायूचे संवर्धन करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. या वर्षी Ozone for Life: 35 Years of Ozone Layer Protection ही संकल्पना घेऊन आज जगभरात हा दिवस साजरा होत आहे. वातावरणाच्या स्थितांबरात थरात पृथ्वीपासून 15 ते 48 कि.मी उंचीपर्यत ओझोन वायु आढळतो. वातारणाच्या वरच्या थरातील ऑक्सिजन रेणूचे (O2) विभाजन सूर्यकिरणातील अतिनिल लहरी करतात, त्यातून ऑक्सिजनचे अणू (O) तयार होतात. ऑक्सिजनचे अणू (O) इतर ऑक्सीजन रेणूशी (O2) जुळुन ओझोनचा ( O3) हा रेणू तयार होतो. अतिनिल लहरी शोषून पुन्हा इतर ऑक्सिजन रेणूशी जुळून ओझोन मध्ये रुपांतरीत होतात. गेल्या काही वर्षात होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. अंटार्टिका खंडावर ओझोन चे होल तयार झाले आहे व त्याचे परिणाम बर्फ वितळणे व तिथे तापमान वाढणे असे दिसत आहेत. क्लोरोफ्लोरो कार्बन(सी एफ सी) हा घटक ओझोनच्या विनाशास कारणीभूत आहेत. फ्रिज, एअरकंडिशनर, प्लास्टिक निर्मिती व उत्पादने व अन्य घटकामुळे या थराचे नुकसान होत आहे. पृथ्वीवरील ओझोन वायूचे प्रमाण कमी झाले तर सूर्यापासून निर्माण झालेल्या अतिनील किरणामुळे कर्करोग, श्वसनांचे व फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजार होऊ शकतात. अतिनिल किरणांमुळे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होईल. ध्रुवा वरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, सागरी भागाचे तापमान वाढेल, सागरी जीव धोक्यात येतील व पर्यावरणावर परिणाम होईल. जागतिक स्तरावर सगळ्या देशानी एकत्र येऊन मानव निर्मित प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे तरच आपण ओझोन चे रक्षण करु. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास करित असताना नैसर्गिक पर्यावरणाचा नाश होणार नाही याची खबरदारी हवी. भविष्यकालीन पिढ्यासाठी पुरेश्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व सरंक्षण केले पाहिजे तरच शाश्वत विकास साधण्यास मदत होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण विभाग
बाबा नाईक महाविद्यालय, कोकरूड
मो 9923497593
[2:38 PM, 9/16/2020] Yuvaraj Mote Bhugol: आज 16 सप्टेबर आहे जागतिक ओझोन दिन म्हणून हा लेख लिहला आहे आपल्या वाचकांना माहिती होईल म्हणून पाठवत आहे आवाज India Live मध्ये आपण प्रकाशित करू शकता @ Yuvraj Mote