Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये* कलाकारांच्या मानधनाची बैठक त्वरित घ्या; जिल्हा परिषद अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीबेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी*घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्तआदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजननगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दानबाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवारआरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचाल

जाहिरात

 

कलाकारांच्या मानधनाची बैठक त्वरित घ्या; जिल्हा परिषद अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

schedule07 May 26 person by visibility 26 categoryसामाजिक

आवाज इंडिया 
​कोल्हापूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने'ची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक गेल्या दोन वर्षांपासून झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेकडो वयोवृद्ध कलाकार मानधनापासून वंचित असून, त्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी लगतच्या आठवड्यात ही बैठक आयोजित करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.  
​जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात अध्यक्षांनी नमूद केले आहे की, कोल्हापूर जिल्हा हा कलाकार, साहित्यिक, शाहीर आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील कलाकारांना न्याय देण्यासाठी शासन ही मानधन योजना राबवते. मात्र, जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी असूनही गेल्या दोन वर्षांपासून या समितीची बैठक झालेली नाही.  
​अर्जांचा डोंगर कायम
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ६७७ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३९७ अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच, सन २०२५-२६ या वर्षासाठी आतापर्यंत ११०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी ५० वर्षांवरील कलाकार पात्र असतात.  
​वयोवृद्ध कलाकारांची पायपीट
मानधनासाठी अर्ज केलेले कलाकार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्या अर्जाचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी या वयोवृद्ध कलाकारांना ग्रामीण भागातून वारंवार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ही हेळसांड थांबवण्यासाठी आणि कलाकारांना दिलासा देण्यासाठी तातडीने बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावावेत, अशी आग्रही विनंती सौ. शिल्पा खोत यांनी केली आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes