Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*

जाहिरात

 

भूस्खलन नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन

schedule28 Jul 21 person by visibility 2315 categoryसामाजिक

डॉ. युवराज मोटे (कोल्हापूर) : भूस्खलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूस्खलनास दरड कोसळणे किंवा भूमिपात असे ही म्हणतात. मुसळधार पाऊस, भूकंप यामुळे डोंगर कड्यांचा भाग खाली कोसळतो म्हणून त्यास भूस्खलन झाले असे म्हटले जाते. डोंगराचा तीव्र उतार, खडकांची रचना, कल व प्रकार, भूमिगत जलाची स्थिती, जंगलतोड, खोदकाम यामुळे पावसाळ्यात डोंगर खचले जातात व भूस्खलन होते. हिमालयामध्ये भूस्खलनाच्या घटना नेहमी घडतात.
 उत्तराखंडमध्ये 2013 व माळीणमध्ये 2014 मध्ये भूस्खलन झाल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात पश्चिम घटामध्ये पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. सध्या राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे महापूराचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये भूस्खलन (दरड) कोसळल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाबरोबरच भूस्खलन (दरडसंकट) ही निर्माण झालेचे दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्तहानी, रस्ते, लोहमार्ग, घरे यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे भूस्खलनाच्या घटना का वाढत आहेत यावर विचार करणे गरजेचे बनले आहे.
 भूस्खलन होण्यास निसर्ग जबाबदार आहे की मानव? हा ही प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टी, भूकंप या नैसर्गिक कारणामुळे भूस्खलन होते. जांभ्या (लॅटराईट) खडकांची झीज होते. उतारावरील घरांच्या बांधकामामुळे माती खाली खचते व दरड कोसळते. मानवनिर्मित कारणामुळे अर्थात शेतीसाठी जमीनीचे सपाटीकरण, रस्ते बांधने, रूंदीकरण, बोगदे, घाट रस्ते करताना केलेली वृक्षतोड, खणलेली चर, उताराचे सपाटीकरण यामुळे भूस्खलनाच्या घटना वाढताना दिसत आहेत. एक्सप्रेस वे, ताम्हिणी घाट, माळशेज घाट, खंबाटकी घाट, आंबा घाट, फोंडा घाट व कोकणातील अन्य घाट रस्त्यांवर दरड कोसळण्यांच्या घटना घडतात. 
भूस्खलन प्रवण भागात वाहतुक मार्गात सुरक्षित भिंती उभारणे गरजेचे आहे. डोंगरावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. भूस्खलन प्रदेशातील गावे, वस्त्या शोधणे, डोंगर भागातील वस्त्या, तेथील लोकांना पावसाळ्यात स्थलांतरित करणे महत्वाचे आहे. अश्या पध्दतीने उपाययोजले तर या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करु शकतो.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes