Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*

जाहिरात

 

गोड साखर निवडणुकीत भाजपचे दोन अपक्ष उमेदवार

schedule30 Oct 22 person by visibility 1364 categoryराजकीय


आवाज इंडिया प्रतिनिधी

गडहिंग्लज:-(महेश भादवणकर) आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी साखर कारखाना लि. हरळी ची २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मतदान रविवारी (६ नोव्हेंबर) होत असून, अनपेक्षित धक्कादायक आघाड्या निर्माण झाल्या. 
 राष्ट्रवादीच्या दोन आमदार एकमेकां विरुद्ध उभे ठाकल्याने ह्या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. या मध्ये दोन पॅनेल तयार करण्यात आले आणि दोन्ही पॅनेल मध्ये सर्वपक्षीय उमेदवार पाहण्यास मिळत आहेत.
भाजपा गडहिंग्लज शहर अध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी गडहिंग्लज- हनिमनाळ आणि भाजपचे प्रीतम कापशे यांनी नुल- नरेवाडी मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. त्यांनी सुरवातीला कोणत्याही पॅनेल सोबत न जाता अपक्ष राहन पसंत केले मात्र नंतर श्री. काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडी या पॅनेला पाठिंबा दिला मात्र त्यांनी आपल्या दोन जागा लढवण्याचा निर्धार पक्का करून प्रचार सुरू केला. 
राजेंद्र तारळे गडहिंग्लज अर्बन बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक त्याच बरोबर भाजपाचे शहर अध्यक्ष असल्याने त्यांचा तालुक्यातील जनतेशी जनसंपर्क चांगला आहे, त्याच बरोबर भाजपचे राज्यात सरकार असताना जनतेची केलेली कामे पाहता ते विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे मानलं जातं आहे. त्याच बरोबर प्रीतम कापशे यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक प्रश्न प्रामुख्याने उचलून धरल्याने त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा जोरदार होताना दिसत आहे.  
दोन मोठ्या पॅनेल समोर हे 2 दोन अपक्ष उमेदवार टक्कर देणार हे सिद्ध झाले आहे. 
यावेळी तारळे यानी आवाज इंडियाशी बोलताना सांगितले की, कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू करून अनेक वर्षे रखडलेला कामगारांचा प्रश्न आम्ही मार्गी लावू, त्याच बरोबर राज्यात आमचे सरकार असल्याने आम्ही सरकार कडून लागेल ती वेळोवेळी मदत घेऊन पुन्हा नव्या दिमाखात कारखाना चालवून दाखवू. भाजप जिल्हाध्यक्ष समरजीसिंह घाटगे यांनी आपला कारखाना सातत्याने एक नंबर वर ठेवला त्याच प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुद्धा कायम प्रयत्न करू. ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था यांचा आपला संपर्क चांगला असून त्यांनी आम्हाला पाठबळ देण्याचा शब्द दिला आहे त्या जोरावर "अंगठी" या चिन्हावर आमच्या दोन्ही अपक्ष जागा निवडणूक आणू असा विश्वास त्यानी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes