+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule20 Mar 23 person by visibility 194 categoryशैक्षणिकशैक्षणिक
डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई-टेंडरिंग कार्यशाळा संपन्न

कसबा बावडा
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर गुणवत्ता असणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या युगामध्ये अभियंत्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे ,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाहुवाडी विभागाचे उपअभियंता धनंजय भोसले यांनी केले.

 कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये ई टेंडरिंग या विषयावरील एक दिवसोय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 श्री भोसले पुढे म्हणाले, सिव्हील इंजिनिअरिंगची चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी सचोटी, परिश्रमाची तयारी, कामाप्रती समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

प्राचार्य डॉ.महादेव नरके म्हणाले की, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील गोष्टींचे ज्ञान उपलब्ध होण्यासाठी पॉलिटेक्निक तर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात.या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निश्चितपणे वाढेल.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक वनिता पाटील यांनी सांगितले की, सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये होत आहे. असे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद येथील ई टेंडर गुरुचे संस्थापक हर्षद बरगे यांनी ई टेंडर फॉर्म कसा भरावा, लायसन्स कशी काढावी, कामे मिळण्यासाठी कोणत्या प्रकारची कागदपत्रे असणे आवश्यक असते, डिजिटल सही कशी काढावी आदी गोष्टीबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच या विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रात्यक्षिकही करून घेतले.

 यावेळी कार्यशाळा समन्वयक प्रा.शिवांगी मालवीया,उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील ,सिव्हील विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा.बी.जी.शिंदे उपस्थित होते.